शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

वसंत कानेटकर स्मृती रंग सोहळा रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:47 IST

: ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्यामुळेच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी झाली आहे. खऱ्या कलावंताचे नाटकातील काम प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते.

नाशिक : ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्यामुळेच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी झाली आहे. खऱ्या कलावंताचे नाटकातील काम प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते. प्रेक्षक मनात घरी घेऊन जातो ते खरे नाटक असते, असे प्रतिपादन अभिनेता सुबोध भावे यांनी केले.सावानाच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित वसंत कानेटकर स्मृती रंगसोहळ्यात ‘कलाकारांसमवेत संवाद’ या कार्यक्रमात भावे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हेमंत टकले उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी भावे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका यापैकी कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडते, अशी विचारणा केली असता भावे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रातील प्रेक्षक वेगळा असतो. मला नाटकात काम करणे सोपे वाटते, तर चित्रपट काम करणे अवघड वाटते. कोणत्याही नटावर भूमिकेचा शिक्का बसायला नको. प्रेक्षकांना आवडत्या भूमिका तर मी करतोच, परंतु मला आवडणाºया नकारात्मक भूमिकादेखील स्वीकारतो त्यामुळेच टीव्ही मालिकेत नकारात्मक भूमिका करत आहे, असेही भावे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात चांगली चित्रपटगृहे नाहीत खंत त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, धर्माजी बोडके, किशोर पाठक, शंकर बोराडे, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक