शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वसंत गितेंच्या नाराजीकडे स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 5, 2014 00:07 IST

समर्थक नगरसेवकही गप्प : पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र संपुष्टात

नाशिक : ‘वसंत गिते यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, पक्षाचा नाही. आपण त्यांची नाराजी निश्चित दूर करू’ असे सांगून पक्षातील गिते समर्थकांना थोपवून धरण्यात यशस्वी झालेले महापौर व स्थायी समिती सभापतींनी दुसऱ्या दिवशी मात्र गिते यांच्याकडे पाठ फिरवित त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी यासंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे हेच घेतील असे सांगून हात झटकले आहेत, तर दुसरीकडे पक्षानेही गिते यांच्या नाराजीकडे गांभीर्याने न घेतल्याने त्यांच्या समर्थकांत चुळबुळ सुरू झाली आहे. निवडणुकीचा कोणताही माहौल दृष्टिपथात नसताना वसंत गिते यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यामागचे गौडबंगाल स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु त्यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या लक्षात घेता, महापालिकेतील मनसेच्या सत्तेला ते धोका पोहोचवू शकतात अशी भीती सत्ताधाऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे सोमवारी गिते यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी तातडीने मनसे नगरसेवकांची बैठक घेऊन शिरगणती केली व त्यांच्यातील नाराजी म्हणजेच वसंत गिते यांच्याविषयीची भावना जाणून घेतली. गिते यांच्या समर्थनार्थ त्र्यंबकेश्वर येथील सात नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामा पाठविण्याचे धाडस केले. त्यामानाने नाशिक या गिते यांच्या होमपिचवर एकाही नगरसेवकाने तसे धाडस न केल्याने एक तर गिते यांच्या पाठीशी एकही नगरसेवक नसल्याचा अर्थ काढला जात असून, दुसरीकडे गिते यांची नाराजी काढली जाणारच आहे तर राजीनामा कशासाठी, असा विचार करूनच बहुधा नगरसेवकांनी गप्प राहणे पसंत केल्याची चर्चा पक्षात होत आहे. गिते यांची समजूत काढू असा शब्द नगरसेवकांना देणारे महापौर मुर्तडक व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी मात्र दुसऱ्याच दिवशी त्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, गिते यांची सेनेच्या व भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांना पक्षप्रवेशाची खुली आॅफर दिल्यानंतरही मनसेच्या स्थानिक नेत्यांनी यासंदर्भात पावले न उचलण्याची बाब पक्ष कार्यकर्त्यांना खटकली आहे. चोवीस तासांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही राजीनाम्याची पक्षाच्या नेत्यांनी दखल घेतलेली नसल्याची चर्चा कार्यकर्ते करीत असून, त्यामुळे गिते यांच्या पदाच्या राजीनाम्यानंतर अन्य पक्ष पदाधिकाऱ्यांनी चालविलेले राजीनामा सत्रही आपोआप संपुष्टात आले आहे.