शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरला द्राक्षबागांसह शेतपिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:30 IST

विंचूर : परतीच्या पावसाने विंचूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांसह डाळींब, मका, बाजरी आदि शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विंचूर : परतीच्या पावसाने विंचूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांसह डाळींब, मका, बाजरी आदि शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या द्राक्षबागेचे झालेले नुकसान पाहून शेतकर्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले असून, येथे आतापर्यंत साडेतीनशे हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पुर्ण झाल्याची माहिती महसुल विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, पंचनाम्याची प्रक्रिया सुरु असली तरी नुकसानभरपाई त्वरीत मिळण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. परतीच्या पावसाने विंचूरसह परिसरातील द्राक्षबागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे डाऊनी, करपा आण िमूळकूज आदी रोगांनी द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. विंचूर व परिसरातील जवळपास ७० ते ८० टक्के बागा वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. विंचूर व परिसरात दुपारनंतर व रात्री पडत असणार्?या परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. ५० टक्के द्राक्ष बागा या फुलोरा अवस्था ते मणी सेटिंग यादरम्यान असल्याने हा पाऊस द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठला आहे. अतिपावसामुळे झाडाच्या खाली मुळी चालेना म्हणुन अक्षरशा बागाच्या फांद्यांना मुळ्या फुटल्या आहेत. पावसाच्या उघडीप नंतर द्राक्षबागांवर औषध फवारणी करण्याची धांदल सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाऊस एवढा पडला नाही परंतु परतीचा पाऊस मात्र मोठ्या प्रमाणात पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक