शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळणार : वैष्णवदास

By admin | Updated: September 12, 2015 23:49 IST

प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळणार : वैष्णवदास

नाशिक : देशभरातून आलेल्या भाविकांना स्नानाचा लाभ मिळावा यासाठी शाही मिरवणूक व स्नानाच्या प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळल्या जाणार असल्याचे दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री महंत वैष्णवदास यांनी सांगितले. साधू-महंतांच्या शाहीस्नानानंतर प्रसाद म्हणून भाविक स्नान करणार आहेत. त्यामुळे त्यांना स्नानासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. मागील पर्वणीपेक्षा भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे दिवसभरात भाविकांना स्नानाची संधी मिळणे आवश्यक आहे. गत पर्वणी काळात बसेस बंद करण्यात आल्या होत्या; मात्र रविवारी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीसाठी बसेस सुरू आहेत. त्यामुळे भाविकांची पायपीट कमी होणार आहे. श्रावण अमावास्या असल्याने भाविकांची शाहीस्नानासाठी गर्दी वाढणार आहे. तसेच साधूंची संख्या वाढणार आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकाला स्नान करणे सोयीचे व्हावे यासाठी नियोजित वेळेत शाही मिरवणूक आणि स्नानाचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या शाही पर्वणीनुसार परंपरेप्रमाणे आरती, पूजा होऊन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. हत्ती, घोड्यांना मिरवणुकीत मनाई करण्यात आली आहे. देशभरातून विविध राज्यांतून भाविक शाहीस्नानासाठी दाखल होणार असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून दिलेल्या वेळेत आखाड्यासह खालशांचे शाहीस्नान व मिरवणूक पार पडणार आहे. दिगंबर अनी आखाड्याचे खालशे जास्त असूनही वेळेबाबत कुठलीही तडजोड होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)