शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच मिनिटांत उरकली मासिक आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:34 IST

सिन्नर : येथील पंचायत समितीची गेल्या महिन्यात तहकूब करण्यात आलेली मासिक आढावा बैठक शनिवारी पाच मिनिटांत सर्व सात विषयांना मंजुरी देत उरकण्यात आली. त्यानंतर विरोधी भाजपाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी एकाधिकारशाही करून दुष्काळासारख्या गांभीर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजपाचे विजय गडाख, रवींद्र पगार व तातू जगताप यांनी केला.

ठळक मुद्देसिन्नर पंचायत समिती : सत्ताधारी दुष्काळाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा भाजपाचा आरोप

सिन्नर : येथील पंचायत समितीची गेल्या महिन्यात तहकूब करण्यात आलेली मासिक आढावा बैठक शनिवारी पाच मिनिटांत सर्व सात विषयांना मंजुरी देत उरकण्यात आली. त्यानंतर विरोधी भाजपाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी एकाधिकारशाही करून दुष्काळासारख्या गांभीर्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजपाचे विजय गडाख, रवींद्र पगार व तातू जगताप यांनी केला.११ आॅक्टोबर रोजी पंचायत समितीची मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी नसल्याने सदर बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर सदर तहकूब बैठक शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. दुपारी एक वाजता भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार व तातू जगताप सभागृहात हजर झाले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे सदस्य सभागृहात आले. बैठक सुरू झाल्यानंतर गडाख व पगार यांनी बैठक उशिरा का सुरू करतात याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर मूळ इतिवृत्ताची मागणी केली. त्यावर कातकाडे यांनी सभेपूर्वीच सर्व सदस्यांना इतिवृत्ताची झेरॉॅक्स व अजेंडा पाठविण्यात आल्याचे सांगितले. उपस्थित सदस्यांनी इतिवृत्तात स्वाक्षरी करावी, अशी मागणी त्यांनी केली; मात्र पगार यांनी आम्हाला मूळ इतिवृत्त दाखविले जात नसल्याने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने त्यावरून भाजपा व सेना सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्याची मागणी कातकाडे यांनी केली. त्यास सेनेच्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिल्याने सर्व विषय पाच मिनिटात मंजूर झाले. सभापती पथवे यांनी सभा संपल्याचे सांगितले व राष्टÑगीत घेण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा उपयोग करून सभा पाच मिनिटांत संपविल्याने भाजपाच्या सदस्यांनी गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. गटनेते गडाख यांनी याबाबत दूरध्वनीहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार केली.दरम्यान, गडाख, पगार व जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाºयांवर एकाधिकारशाहीचा आरोप केला. तालुका दुष्काळी जाहीर झाल्यामुळे त्यावर चर्चा करून टॅँकर नियोजन, चाराटंचाईवर उपाययोजना यावर चर्चा करणे अपेक्षित होते; मात्र सत्ताधाºयांनी पाच मिनिटांत सभा उरकल्याने भाजपा सदस्यांनी संताप व्यक्त केला. पूर्व भागात दुष्काळाची दाहकता असताना सत्ताधारी या परिसरावर अन्याय करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दुष्काळ व महत्त्वाच्या विषयांवर आम्हाला चर्चा करायची होती; मात्र विरोधकांनी बैठकीला दहा मिनिटे उशीर झाल्याचा कांगावा केला.

सर्वांना सभेपूर्वीच गेल्या सभेचा इतिवृत्त घरपोहोच केला होता; मात्र विरोधकांना जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी त्यांनी आकांडतांडव करण्यास प्रारंभ केला. आमच्याकडून चूक होत असेल तर बैठकीत मांडण्याचे सोडून विरोधक बिनकामाच्या विषयावर चर्चा करू लागले. इतिवृत्तावर स्वाक्षºया करण्यास नकार दिला. सही नसेल तर चर्चेत भाग घेताच कसा येईल? दडपशाही करण्याचा प्रश्नच येत नाही. लोकशाहीनुसार कामकाज केले जाते. विरोधकांचे आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत. - संग्राम कातकाडे, गटनेता, शिवसेना.