शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वापरून कचऱ्यात फेकलेला मास्क ठरतोय धोकादायक, पालिकेची नष्ट करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:13 IST

नाशिक : शहरात कोराेना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून ...

नाशिक : शहरात कोराेना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत

असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात

फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत

आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अन्य नागरिकांनाही

संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी जी

त्रिसूत्री घालून दिली आहे. त्यात मास्कचा वापर अपरिहार्य ठरला

आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क वापरून झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला

फेकून देतात, तसेच अनेक नागरिक घरातील कचऱ्यात टाकून देतात. त्यामुळे

घंटागाडीत टाकलेला हा कचरा घरगुती कचऱ्यात मिसळला जातो. त्याला

हाताळण्यातून संसर्गही होऊ शकतो.

मास्कचा वापर नागरिक करतात, ही चांगली बाब असली, तरी त्याची शास्त्रोक्त

पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत त्यांना माहिती नाही. मास्क वेगळ्या

कागदी पिशवीत दिल्यास महापालिकेच्या घंटागाडीत घातक कचऱ्यासाठी वेगळा लाल

डबा असतो. त्यात टाकून तो सुरक्षित नेता येईल, परंतु नागरिक ओला-सुका कचराही वर्गीकरण करून देत नाहीत, तेथे मास्कची स्वतंत्र पिशवी कोण देणार, असा प्रश्न आहे.

कोट...

नागरिकांनी वापरलेल्या मास्कची असुरक्षित पद्धतीने हाताळणी धोकादायक ठरू

शकते. नागरिक मास्क घरगुती कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्या दिवशी

घंटागाडीत देतात. मात्र, त्याच्या हाताळणीतून घंटागाडी कामगारांना धोका

निर्माण होऊ शकतो. अनेक घंटागाडी कामगारांना यापूर्वीही कोरोना संसर्ग

झाला आहे. नागरिकांना मास्कची शास्त्रोक्त विल्हेवाट लावता येत नसली, तरी

रस्त्यावर टाकू नये अथवा घरगुती कचऱ्यातच टाकून देऊ नये.

- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन

इन्फो...

दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?

नाशिक महापालिकेच्या वतीने पाथर्डी शिवारात असलेल्या घनकचरा व्यवस्थापन

प्रकल्पात इन्सिनरेटर म्हणजे मोठी भट्टी आहे. महापालिकेच्या

घंटागाड्यातून येणाऱ्या सहाशे टन कचऱ्यात मास्क सापडल्यानंतर, ते या

भट्टीत नष्ट केले जातात. नागरिकांनी घंटागाडीत स्वतंत्र पद्धतीने मास्क

दिल्यास, त्यात घातक कचऱ्यासाठी वेगळी पेटी असते. त्यात सोडियम व्हेपोराइड

असते. त्यात असे मास्क टाकून नंतर ते खतप्रकल्पावरील घंटागाडीत नष्ट केले

जातात.

इन्फो...

रुग्णालयातील घातक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट

नाशिक शहरात २००० मध्येच जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कन्नमवार

पुलाजवळ प्रकल्प आहे. तेथे घातक कचरा भट्टीमध्ये विशिष्ट तापमानात टाकून

नष्ट केला जातो. तर ज्या वस्तू रिसायकल होऊ शकतात, त्या तुकडे-तुकडे करून

संबंधीित कारखान्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. नाशिकमध्ये सुमारे वीस

वर्षांपूर्वी अशा प्रकारचा जैविक कचरा निर्मूलन प्रकल्प राबविण्यात

आला. आता कोरोना काळात तो उपयुक्त ठरत आहे.

इन्फो...

६०० टन

शहरात रोज निघणारा कचरा

४०० टन ओला कचरा

२०० टन सुका कचरा