शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वापरून कचऱ्यात फेकलेला मास्क ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:12 IST

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अन्य नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.

ठळक मुद्देपालिकेची नष्ट करण्यासाठी तारांबळ : कामगारांसह अनेक जण बाधित होण्याची शक्यता

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अन्य नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी जी त्रिसूत्री घालून दिली आहे. त्यात मास्कचा वापर अपरिहार्य ठरला आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क वापरून झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला फेकून देतात, तसेच अनेक नागरिक घरातील कचऱ्यात टाकून देतात. त्यामुळे घंटागाडीत टाकलेला हा कचरा घरगुती कचऱ्यात मिसळला जातो. त्याला हाताळण्यातून संसर्गही होऊ शकतो.मास्कचा वापर नागरिक करतात, ही चांगली बाब असली, तरी त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत त्यांना माहिती नाही. मास्क वेगळ्या कागदी पिशवीत दिल्यास महापालिकेच्या घंटागाडीत घातक कचऱ्यासाठी वेगळा लाल डबा असतो. त्यात टाकून तो सुरक्षित नेता येईल, परंतु नागरिक ओला-सुका कचराही वर्गीकरण करून देत नाहीत, तेथे मास्कची स्वतंत्र पिशवी कोण देणार, असा प्रश्न आहे.नागरिकांनी वापरलेल्या मास्कची असुरक्षित पद्धतीने हाताळणी धोकादायक ठरू शकते. नागरिक मास्क घरगुती कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्या दिवशी घंटागाडीत देतात. मात्र, त्याच्या हाताळणीतून घंटागाडी कामगारांना धोका निर्माण होऊ शकतो. अनेक घंटागाडी कामगारांना यापूर्वीही कोरोना संसर्ग झाला आहे. नागरिकांना मास्कची शास्त्रोक्त विल्हेवाट लावता येत नसली, तरी रस्त्यावर टाकू नये अथवा घरगुती कचऱ्यातच टाकून देऊ नये.- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन.दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?नाशिक महापालिकेच्या वतीने पाथर्डी शिवारात असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात इन्सिनरेटर म्हणजे मोठी भट्टी आहे. महापालिकेच्या घंटागाड्यातून येणाऱ्या सहाशे टन कचऱ्यात मास्क सापडल्यानंतर, ते या भट्टीत नष्ट केले जातात. नागरिकांनी घंटागाडीत स्वतंत्र पद्धतीने मास्क दिल्यास, त्यात घातक कचऱ्यासाठी वेगळी पेटी असते. त्यात सोडियम व्हेपोराइड असते. त्यात असे मास्क टाकून नंतर ते खतप्रकल्पावरील घंटागाडीत नष्ट केले जातात.रुग्णालयातील घातक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाटनाशिक शहरात २००० मध्येच जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कन्नमवार पुलाजवळ प्रकल्प आहे. तेथे घातक कचरा भट्टीमध्ये विशिष्ट तापमानात टाकून नष्ट केला जातो. तर ज्या वस्तू रिसायकल होऊ शकतात, त्या तुकडे-तुकडे करून संबंधीित कारखान्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. नाशिकमध्ये सुमारे वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारचा जैविक कचरा निर्मूलन प्रकल्प राबविण्यात आला. आता कोरोना काळात तो उपयुक्त ठरत आहे.६०० टन शहरात रोज निघणारा कचरा ४०० टन ओला कचरा २०० टन सुका कचरा 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या