शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

शहरी माओवाद घातक समस्या :  स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:07 IST

लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याचे सांगणारे माओवादी हे लोकांवर लढा लादून स्वत:ची राजकीय सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे,

नाशिक : लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याचे सांगणारे माओवादी हे लोकांवर लढा लादून स्वत:ची राजकीय सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. माओवाद्यांनी भारताविरुद्ध लढा उभारून त्याला ‘क्रांती’ असे नाव देत शहरी भागाची मदत मिळविण्यासाठी शहरी माओवाद पसरविण्यास सुरुवात केली, ही देशापुढील मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन भारतीय सैन्याच्या कोअर आॅफ इंजिनियर्स विभागातून निवृत्त झालेल्या कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.  मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प गायकवाड यांनी बुधवारी (दि.१२) गुंफले. ‘माओवाद आणि अंतर्गत सुरक्षा’ या विषयावर बोलताना त्यांनी माओ विचारसरणीतून जन्माला आलेला नक्षलवाद, काळानुरूप बदलत गेलेली युद्धनीती व स्वरूप, जंगलात जन्मलेला नक्षलवाद व माओवाद शहरी माओवाद बनला असून, त्यांची ध्येय, उद्दिष्ट्ये यांचा चौफेर आढावा घेतला. यावेळी गायकवाड म्हणाल्या, ७०च्या दशकात कोंडापल्ली सीतारमय्या याने शहरी नक्षलवादासाठी पीपल्स फ ॉर ग्रुप ही संघटना चालविली.१९८०-९५ हा कालावधी सीतारमय्याने चांगलाच गाजविला; मात्र त्यानंतर त्याला फारसे बळ मिळाले नाही. कारण नक्षलवादी, माओवादी संघटना या विखुरलेल्या होत्या. मात्र २००१ नंतर भारत हा मोठा शत्रू मानत सुमारे ४० पेक्षा अधिक संघटना भारताविरोधी लढ्यासाठी एकत्र झाल्या. २००४ पासून त्यांच्या भारताविरोधी लढ्याला अधिकच बळ मिळत गेले. त्यांनी या लढ्याला क्रांती असे संबोधले. पारंपरिक हत्यारांचा वापर करणारे माओवादी हे २००४ नंतर सैनिकी प्रशिक्षण घेऊन आधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झाले. आताची लोकशाही ही लोकांची नाही, असे सांगून माओवाद्यांनी भारताची शासकीय यंत्रणा आणि संविधानाला उद्ध्वस्त करण्याचे अंतिम ध्येय ठेवले आहे, असे गायकवाड यांनी यावेळी अधोरेखित केले.कोरेगाव-भीमा दंगलीमागे शहरी माओवादकोरेगाव-भीमा दंगलीमागे शहरी माओवाद विचार तपासी यंत्रणांच्या माध्यमातून पुढे आला आहे. या दंगलीचे धागेदोरे पुण्याच्या शनिवारवाड्यात झालेल्या एल्गार परिषदेशी जोडलेले असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. कोरेगाव-भीमामध्ये एल्गार परिषदेने दहशत पसरविली. या परिषदेच्या आयोजनामागे असलेल्या संघटनांनी ‘आजच्या पेशवाईशी लढण्यासाठी कंबर कसा’, ‘भीमा कोरेगावने दिला धडा, नवी पेशवाई म्हसणात गाडा’ अशी टॅगलाइनची पत्रे वाटली. आंबेडकरवादी संविधानविरोधी कधीच असू शकत नाही, जे संविधानविरोधी आहेत केवळ माओवादीच, असे गायकवाड म्हणाल्या.

टॅग्स :Nashikनाशिक