शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

चुका सुधारल्याने पर्वणी सुकर

By admin | Updated: September 13, 2015 21:57 IST

गिरीश महाजन : बंदोबस्त तेवढाच; पण धोरणात बदल

नाशिक : अधिकाऱ्यांकडून चुका होतात, अनुभवातूनच माणसे शिकतात. त्याप्रमाणे गेल्या वेळच्या पर्वणीत झालेल्या चुका सुधारल्याने कुंभमेळ्याची द्वितीय स्नानपर्वणी भाविक व नाशिककरांसाठी सुकर झाल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केला. पोलिसांचा बंदोबस्त न घटवता धोरणात बदल केल्याने हे घडू शकल्याचेही ते म्हणाले. कुंभमेळ्याच्या द्वितीय पर्वणीनिमित्त सकाळी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या रामकुंडावर दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या पर्वणीला लोकांना अधिक प्राधान्य व स्वातंत्र्य देण्याचा विचार करण्यात आला. गेल्या पर्वणीत बंदोबस्ताचे नियोजन चुकल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी बैठक घेतली. त्यात भाविकांना स्नानासाठी अर्धा ते एक किलोमीटरच चालावे लागेल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. शहरातील बॅरिकेडिंग कमी करण्यात आले. गेल्या वेळी साधूंच्या आखाड्यांचे स्नान होईपर्यंत भाविकांना गोदाघाटावर प्रवेश देण्यात आला नव्हता. यंदा मात्र गोदाघाटाचा गौरी पटांगण, रोकडोबा पटांगण, यशवंतराव महाराज पटांगण, गांधी तलाव हा भाग शाहीस्नानापूर्वीच भाविकांना स्नानासाठी खुला करून देण्यात आला. त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांना पर्वणी साधता आली. याशिवाय शाही मिरवणूकही भाविकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली. या मार्गावरील निर्बंध घटवण्यात आले. गेल्या पर्वणीत पंधरा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळीही पोलिसांचे संख्याबळ तेवढेच ठेवण्यात आले असून, सुरक्षेत तडजोड करण्यात आली नाही; मात्र धोरणात काही बदल करण्यात आले. पिठोरी अमावास्येमुळे यावेळी पर्वणीसह ७२ तासांचा स्नानाचा मुहूर्त होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून रविवारी सकाळपर्यंत नाशिकमध्ये सुमारे पंधरा लाख भाविकांनी स्नान केल्याचेही महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)