शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

शेतकऱ्यांना न वापरलेल्या विजेची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:34 IST

नांदगाव : तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती उद्भवली असताना, वीजजोडणी खंडित केल्यानंतरही न वापरलेल्या विजेपोटी हजारो रुपयांची बिले शेतकºयांना आकारण्यात येत आहेत. एकट्या माणिकपुंज धरणातील पाणी उपसणाºया शेकडो कृषिपंप ग्राहकांना अशाप्रकारे अदा केलेल्या बिलांची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने एकाच वेळी अस्मानी व सुलतानीला तोंड देण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : कृषिपंपधारकांकडून चौकशीची मागणी

 

नांदगाव : तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती उद्भवली असताना, वीजजोडणी खंडित केल्यानंतरही न वापरलेल्या विजेपोटी हजारो रुपयांची बिले शेतकºयांना आकारण्यात येत आहेत. एकट्या माणिकपुंज धरणातील पाणी उपसणाºया शेकडो कृषिपंप ग्राहकांना अशाप्रकारे अदा केलेल्या बिलांची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने एकाच वेळी अस्मानी व सुलतानीला तोंड देण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे.वीज वितरण कंपनी खंडित विजेचे बिल आकारून आर्थिक संकटात लोटत असल्याचा आक्षेप माणिकपुंज धरणातल्या कृषिपंप ग्राहकांनी घेतला असून, याप्रकरणी माहितीच्या अधिकारातील पत्राचे महिना उलटून गेल्यानंतरही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे यामागे दडलंय काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जुलै २०१७ मध्ये माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बसविलेल्या अधिकृत/अनधिकृत वीजपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र खंडित करण्यात आले. नोव्हेंबर २०१७ मध्ये ते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर सुरू असलेला वीजपुरवठा यावर्षी १८ जुलै २०१८ रोजी खंडित करण्यात आला. यासंदर्भात विचारणा करणाºया शेतकºयांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला. पर्जन्यमान अत्यल्प असल्याने माणिकपुंज धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे, असे उत्तर शेतकरीवर्गाला देण्यात आले. त्याविषयी त्यांची तक्रार नाही; मात्र वीजपुरवठा शासनानेबंद केला आहे. मग बंद कालावधीतील बिल का भरावे, असा शेतकरी ग्राहकांचा प्रश्न आहे. गेल्या वर्षी चार महिने व यंदा पाऊस पडला नाही तर अनिश्चित काळ वीजपुरवठा बंद करण्यात येणार असेल तर या कालावधीचे बिल कशासाठी? म्हणून काही जणांनी तात्पुरते बंद करा, अशी विनंती केली. परंतु ती धुडकावून लावण्यात आली. कायमस्वरूपी बंद करा, असे सांगण्यात आले. म्हणजे चार महिन्यांनतर नवीन कनेक्शन घ्या. कोटेशन घ्या... १० ते १५ हजार रु पये भरा. वीज वितरणाकडे चकरा मारा. त्यासाठी महिना घालवा. असे करण्याऐवजी वीज बंद कालावधीचे बिल आकारू नका, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.माणिकपुंज परिसरात अधिक तक्रारदार१० अश्वशक्तीचा पंप असलेल्या ग्राहकाला वीज बंद असलेल्या चार महिन्यांचे बिल अकरा ते बारा हजार रु पये आले आहे. कोणाचे पाच अश्वशक्तीचे तर कुणाचे अजून वेगळे.. असे सुमारे २०० ते ३०० पंप माणिकपुंजमध्ये आहेत. वीजबिल थकले तर कारवाईची तत्परता दाखविणारे वीज वितरणचे अधिकारी व शासन, ‘न दिलेल्या विजेचे’ पैसे कोणत्या नियमानुसार आकारू शकतात याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वीजपंपधारक करत आहेत.