शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

शेतकऱ्यांना न वापरलेल्या विजेची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:34 IST

नांदगाव : तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती उद्भवली असताना, वीजजोडणी खंडित केल्यानंतरही न वापरलेल्या विजेपोटी हजारो रुपयांची बिले शेतकºयांना आकारण्यात येत आहेत. एकट्या माणिकपुंज धरणातील पाणी उपसणाºया शेकडो कृषिपंप ग्राहकांना अशाप्रकारे अदा केलेल्या बिलांची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने एकाच वेळी अस्मानी व सुलतानीला तोंड देण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा महिना : कृषिपंपधारकांकडून चौकशीची मागणी

 

नांदगाव : तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती उद्भवली असताना, वीजजोडणी खंडित केल्यानंतरही न वापरलेल्या विजेपोटी हजारो रुपयांची बिले शेतकºयांना आकारण्यात येत आहेत. एकट्या माणिकपुंज धरणातील पाणी उपसणाºया शेकडो कृषिपंप ग्राहकांना अशाप्रकारे अदा केलेल्या बिलांची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने एकाच वेळी अस्मानी व सुलतानीला तोंड देण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे.वीज वितरण कंपनी खंडित विजेचे बिल आकारून आर्थिक संकटात लोटत असल्याचा आक्षेप माणिकपुंज धरणातल्या कृषिपंप ग्राहकांनी घेतला असून, याप्रकरणी माहितीच्या अधिकारातील पत्राचे महिना उलटून गेल्यानंतरही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे यामागे दडलंय काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जुलै २०१७ मध्ये माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बसविलेल्या अधिकृत/अनधिकृत वीजपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र खंडित करण्यात आले. नोव्हेंबर २०१७ मध्ये ते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर सुरू असलेला वीजपुरवठा यावर्षी १८ जुलै २०१८ रोजी खंडित करण्यात आला. यासंदर्भात विचारणा करणाºया शेतकºयांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला. पर्जन्यमान अत्यल्प असल्याने माणिकपुंज धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे, असे उत्तर शेतकरीवर्गाला देण्यात आले. त्याविषयी त्यांची तक्रार नाही; मात्र वीजपुरवठा शासनानेबंद केला आहे. मग बंद कालावधीतील बिल का भरावे, असा शेतकरी ग्राहकांचा प्रश्न आहे. गेल्या वर्षी चार महिने व यंदा पाऊस पडला नाही तर अनिश्चित काळ वीजपुरवठा बंद करण्यात येणार असेल तर या कालावधीचे बिल कशासाठी? म्हणून काही जणांनी तात्पुरते बंद करा, अशी विनंती केली. परंतु ती धुडकावून लावण्यात आली. कायमस्वरूपी बंद करा, असे सांगण्यात आले. म्हणजे चार महिन्यांनतर नवीन कनेक्शन घ्या. कोटेशन घ्या... १० ते १५ हजार रु पये भरा. वीज वितरणाकडे चकरा मारा. त्यासाठी महिना घालवा. असे करण्याऐवजी वीज बंद कालावधीचे बिल आकारू नका, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.माणिकपुंज परिसरात अधिक तक्रारदार१० अश्वशक्तीचा पंप असलेल्या ग्राहकाला वीज बंद असलेल्या चार महिन्यांचे बिल अकरा ते बारा हजार रु पये आले आहे. कोणाचे पाच अश्वशक्तीचे तर कुणाचे अजून वेगळे.. असे सुमारे २०० ते ३०० पंप माणिकपुंजमध्ये आहेत. वीजबिल थकले तर कारवाईची तत्परता दाखविणारे वीज वितरणचे अधिकारी व शासन, ‘न दिलेल्या विजेचे’ पैसे कोणत्या नियमानुसार आकारू शकतात याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वीजपंपधारक करत आहेत.