शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

अवकाळी पावसाने प्रचाराचे  नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:09 IST

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची  रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची  रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ हजार १०५ उमेदवार आपले नशीब आजमवीत आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार यंदा उमेदवारांना प्रचाराचा वेळ तसाही कमी मिळणार असल्याने, उमेदवारांनी माघारीच्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती, परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने उमेदवारांच्या मनसुब्यांवरही पाणी फिरले आहे. प्रचाराचे नियाेजन पावसामुळे कोलमडल्यामुळे कमी वेळेत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने, उमेदवारांच्या हाती आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक राजकीय नेते, तसेच स्थानिक पुढाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याने जवळपास दीड हजार प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, तर काही ठिकाणी ऐन वेळी उमेदवाराने अर्ज कायम ठेवल्याने दोन ते चार जागांसाठीच मतदान होत आहे. त्यामुळे या जागांमधील चुरशीची लढत महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकांमध्ये आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे आमदारांनीही लक्ष घातल्याने आगामी दिवसात निवडणुकीतील चुरस अधिक बघायला मिळू शकते.  येत्या १३ सारखेला सायंकाळी प्रचाराची अधिकृत सांगता होणार असून, त्यानंतर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख केली जाणार आहे. मतदानाच्या पूर्वीच्या दोन दिवसांतील घडोमोडीवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा कार्यक्रमही आखण्यात आला आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. १५ तारखेला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. प्रशासकीय तयारी पूर्णत्वाकडेप्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहे. जिल्ह्यातील एकूण १,९३३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी अंदाजे १० हजार इतके कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील २,१३२ प्रभागामंध्ये ५,८९५ जागांसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यापैकी १,६२७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक