शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सिन्नरला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

सिन्नर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तत्काळ पंचनामे ...

सिन्नर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिन्नर पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी केली आहे. कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीही बर्के यांनी निवेदनात केली आहे. तालुक्यातील बहुतेक ठिकाणी रविवारी व सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे, असेही सभापती बर्के यांनी म्हटले आहे. तालुक्यात गहू व कांदा या पिकांचे पंधराशेहून अधिक हेक्टवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेला गहू, हरभरा, उन्हाळ बाजरी, कांदा तसेच फळबांगाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोनाचे संकट, शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. असे असतानाच आता पुन्हा गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी बर्के यांनी केली आहे.

-------------------

२० ते २५ गावांमध्ये नुकसान

रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील २० ते २५ गावांना फटका बसला आहे. दापूर, गोंदे, शिवाजीनगर, दत्तनगर, खंबाळे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, कोळगावमाळ, सायाळे, मलढोण, मऱ्हळ, वावी, कहांडळवाडी, पिंपरवाडी, मिरगाव, दोडी बुद्रक, दोडी खुर्द, निऱ्हाळे, कणकोरी, नांदूरशिंगोटे, चापडगाव आदी भागात पावसाचा तडाखा बसला.

-------------

कांदा व फळबागांचे नुकसान

दापूर व परिसराला दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा तडाखा बसला. परिसरात डाळिंबबागांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. अवकाळी पावसाचा मोठा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच या भागात यावर्षीही कांदा पिकांची चांगल्या प्रमाणात लागवड होती. परंतु गारपिटीने सर्वच पिकांची नासाडी झाली आहे.