शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बेमोसमी पावसाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:52 IST

सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.

सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याची संकटांनी यंदाही पाठ सोडलेली नाही. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने जेरीस आणले आहे. दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस कोसळत असतानाच द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या अनेक बागा दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहे. दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असणाऱ्या बागांना पाणी जास्त झाल्यास त्याची गळ आणि कूज होते. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने द्राक्षबागांना पुरेसे ऊन मिळत नाही. त्यामुळे भागांची गळ, कूच होऊ लागली आहे निफाड तालुक्यातील ३५ टक्के द्राक्षबागा गळीने खराब झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष पंढरीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे यंदा रोपांचा तुटवडा झालेला कांद्याच्या लागवडी घट झाली आहे लागवड केलेला कांदा पुन्हा पावसात सापडल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याचे उत्पादनात घट होणार आहे. पहाटे झालेल्या पावसात शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबले. कांद्याचे वाफे, द्राक्ष बागाच्या गल्ल्या आणि भाजीपाला या ठिकाणी पाणी तुंबल्याने सर्वच पिकांची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारांचा फटका, बेभावात विकणारा शेतमाल यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी होत चालला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्व पिके शेतामध्ये बहरलेला असतानाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करून टाकले.

टॅग्स :Nashikनाशिक