शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

अवकाळी पावसाने मोडला अर्थिक कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 16:57 IST

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.

ठळक मुद्देनुकसानीत वाढ : द्राक्षे उत्पादक, विटभट्टीचालक देशोधडीला

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.तालुक्याला द्राक्षे उत्पादक क्षेत्रातील द्राक्षेपंढरी या नावाने सर्वत्र ओळखले जाते. परंतु या द्राक्षेपंढरीला निसर्गाच्या वक्रदृष्टीचे एकप्रकारे ग्रहण लागले आहे. मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. आता या हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, या आशेवर तग धरून बळीराजाने मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून द्राक्षे हंगामास सुरुवात केली. परंतु अस्मानी संकटाचा घाला घातला व होत्याचे नव्हते करून टाकले.या अवकाळी पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष बागा पुर्णपणे तडे गेल्यामुळे मोठ्या आर्थिक हानीचा फटका शेतकरी वर्गाला बसला. या अवकाळी पावसाने तोंडाजवळ आलेला उत्पन्नांचा भाग निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हिरावून गेला.दिंडोरी तालुक्यात जवळ जवळ ७० टक्के द्राक्षबागा आहेत. परंतु दोन ते तीन वर्षापासुन अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, परतीचा पाऊस, कोरोना, बेमोसमी पडणारा पाऊस आदींमुळे प्रत्येक हंगामात शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे.अवकाळी पावसाने लखमापुर, पिंपरखेड, नळवाडी, करजंवण, अवनखेड, दहेगाव, वागळूद आदी गावांना मोठा धक्का दिला आहे. यामध्ये जवळपास कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून परत एकदा या द्राक्षे पंढरीतील बळीराजांवर आर्थिक संकटांची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे विविध बँका, सहकारी सोसायटी, पतसंस्था, व इतर ठिकाणांहून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या समस्यांनी शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.ज्या द्राक्षे बागांच्या घडांना तडे गेलेले आहेत. त्यांना घेण्यासाठी द्राक्षे व्यापारी वर्ग आपली नापसंती दाखवित असल्याने आता पुढे काय? असा सवाल शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे.नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान कसे भरून मिळेल याकडे सर्व शेतकरी वर्गाच्या नजरा लागल्या आहेत.गहु, हरभरा व इतर नगदी भांडवल देणा-या पिकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने यंदा या पिकांच्या उत्पादन क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा या पिकांची जी सरासरी मिळते. ती मिळणे आता शक्य नाही. असे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.दिंडोरी तालुक्यात लखमापुर, करजंवण, दिंडोरी, नाळेगाव, वरखेडा इ्यादी गावांमध्ये विटभट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसाने तयार केलेल्या कच्च्या विटा पुर्णपणे जमीनदोस्त करून टाकल्या आहेत. त्यामुळे विटभट्टीचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता कच्च्या मालाचे पैसे, मजुरी कशी फेडावी ही समस्या विटभट्टीचालकांना भेडसावत आहे.मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. त्यात एक वर्षभर एक पैसाही हातात आला नाही. आता व्यवसाय सुरू झाला आणि निसर्गाच्या वक्रदृष्टीने तेही हिरावून घेतल्याने विटभट्टीचालक याही वर्षी आर्थिक संकटाच्या दरीत कोसळले आहे. या अवकाळी व बेमोसमी पावसाने जवळजवळ दिंडोरी तालुक्यातील आर्थिक कणाच मोडला आहे.मागील तीन चार वर्षांपासून द्राक्षे पिकांने साथ दिली नाही. परंतु यंदा मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून मोठ्या मेहनतीने द्राक्षे बागा तयार केल्या व मनासारखे पिकही आले. परंतु अवकाळी पावसाने संपूर्ण द्राक्षे घडांना तडे गेल्याने आमचे भांडवल, मजुरी, केलेला खर्च पुर्णपणे मातीला मिळाळा. आम्ही परत एकदा आर्थिक संकटांच्या दरीत सापडलो आहोत.- मनोज राजदेव, शेतकरी, लखमापुर.  

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती