शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

अवकाळी पावसाने मोडला अर्थिक कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 16:57 IST

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.

ठळक मुद्देनुकसानीत वाढ : द्राक्षे उत्पादक, विटभट्टीचालक देशोधडीला

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.तालुक्याला द्राक्षे उत्पादक क्षेत्रातील द्राक्षेपंढरी या नावाने सर्वत्र ओळखले जाते. परंतु या द्राक्षेपंढरीला निसर्गाच्या वक्रदृष्टीचे एकप्रकारे ग्रहण लागले आहे. मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. आता या हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, या आशेवर तग धरून बळीराजाने मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून द्राक्षे हंगामास सुरुवात केली. परंतु अस्मानी संकटाचा घाला घातला व होत्याचे नव्हते करून टाकले.या अवकाळी पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष बागा पुर्णपणे तडे गेल्यामुळे मोठ्या आर्थिक हानीचा फटका शेतकरी वर्गाला बसला. या अवकाळी पावसाने तोंडाजवळ आलेला उत्पन्नांचा भाग निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हिरावून गेला.दिंडोरी तालुक्यात जवळ जवळ ७० टक्के द्राक्षबागा आहेत. परंतु दोन ते तीन वर्षापासुन अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, परतीचा पाऊस, कोरोना, बेमोसमी पडणारा पाऊस आदींमुळे प्रत्येक हंगामात शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे.अवकाळी पावसाने लखमापुर, पिंपरखेड, नळवाडी, करजंवण, अवनखेड, दहेगाव, वागळूद आदी गावांना मोठा धक्का दिला आहे. यामध्ये जवळपास कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून परत एकदा या द्राक्षे पंढरीतील बळीराजांवर आर्थिक संकटांची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे विविध बँका, सहकारी सोसायटी, पतसंस्था, व इतर ठिकाणांहून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या समस्यांनी शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.ज्या द्राक्षे बागांच्या घडांना तडे गेलेले आहेत. त्यांना घेण्यासाठी द्राक्षे व्यापारी वर्ग आपली नापसंती दाखवित असल्याने आता पुढे काय? असा सवाल शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे.नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान कसे भरून मिळेल याकडे सर्व शेतकरी वर्गाच्या नजरा लागल्या आहेत.गहु, हरभरा व इतर नगदी भांडवल देणा-या पिकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने यंदा या पिकांच्या उत्पादन क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा या पिकांची जी सरासरी मिळते. ती मिळणे आता शक्य नाही. असे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.दिंडोरी तालुक्यात लखमापुर, करजंवण, दिंडोरी, नाळेगाव, वरखेडा इ्यादी गावांमध्ये विटभट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसाने तयार केलेल्या कच्च्या विटा पुर्णपणे जमीनदोस्त करून टाकल्या आहेत. त्यामुळे विटभट्टीचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता कच्च्या मालाचे पैसे, मजुरी कशी फेडावी ही समस्या विटभट्टीचालकांना भेडसावत आहे.मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. त्यात एक वर्षभर एक पैसाही हातात आला नाही. आता व्यवसाय सुरू झाला आणि निसर्गाच्या वक्रदृष्टीने तेही हिरावून घेतल्याने विटभट्टीचालक याही वर्षी आर्थिक संकटाच्या दरीत कोसळले आहे. या अवकाळी व बेमोसमी पावसाने जवळजवळ दिंडोरी तालुक्यातील आर्थिक कणाच मोडला आहे.मागील तीन चार वर्षांपासून द्राक्षे पिकांने साथ दिली नाही. परंतु यंदा मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून मोठ्या मेहनतीने द्राक्षे बागा तयार केल्या व मनासारखे पिकही आले. परंतु अवकाळी पावसाने संपूर्ण द्राक्षे घडांना तडे गेल्याने आमचे भांडवल, मजुरी, केलेला खर्च पुर्णपणे मातीला मिळाळा. आम्ही परत एकदा आर्थिक संकटांच्या दरीत सापडलो आहोत.- मनोज राजदेव, शेतकरी, लखमापुर.  

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती