शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:35 IST

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्व दूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्तीला अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले असले तरी, नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपुर्ण असून, डिसेंबर अखेर काम पुर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक ...

ठळक मुद्दे९८ टक्केच काम पुर्ण : डिसेंबर अखेर मुक्तीजिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपुर्ण

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्व दूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्तीला अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले असले तरी, नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपुर्ण असून, डिसेंबर अखेर काम पुर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी व्यक्त केली आहे.राज्यात पावसाळ्यात प्रमुख राज्यमहामार्ग व जिल्हामार्गाच्या दुरावस्थेवरून विरोधी पक्षांनी व विशेषत: राष्ट्रवादी कॉँग्रेसने ‘खड्डे विथ सेल्फी’ अभियान राबवून राज्य सरकारला जेरीस आणले होते. खराब रस्त्यांमुळे होणारे लहान-मोठे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने शासनाने खड्डे बुजवावेत अशी मागणीही जोर धरू लागली होती. त्यातूनच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभुमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रमुख राज्यमार्ग व जिल्हामार्गावरील खड्डयांची माहिती मागविली होती. नाशिक जिल्ह्यातून जाणा-या राज्यमार्गाची लांबी १६८० किलोमीटर इतकी असून, प्रमुख जिल्हा मार्ग २५०० किलोमीटरचा आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार सुमारे ३५ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च होणार असून, त्यानुसार ठेकेदाराची नेमणूक करून राज्यमार्गाचे १६६० किलोमीटरचे व प्रमुख जिल्हामार्गाचे २२५२ किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच ज्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास तो वर्षभरात बुजविण्याची जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करण्यात आली आहे. या खड्डेमुक्ती अभियानात फक्त खड्डे बुजविण्याचेच काम हाती घेण्यात आले आहे, मात्र ज्या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ आहे त्या मार्गावरील डांबर निघालेले असेल तर ते या अभियानात दुरुस्त करणे अपेक्षित नाही, त्यासाठी नवीन रस्त्याचे बळकटीकरण हेच गृहीत धरण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक