शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:35 IST

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्व दूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्तीला अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले असले तरी, नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपुर्ण असून, डिसेंबर अखेर काम पुर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक ...

ठळक मुद्दे९८ टक्केच काम पुर्ण : डिसेंबर अखेर मुक्तीजिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपुर्ण

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्व दूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्तीला अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले असले तरी, नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपुर्ण असून, डिसेंबर अखेर काम पुर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी व्यक्त केली आहे.राज्यात पावसाळ्यात प्रमुख राज्यमहामार्ग व जिल्हामार्गाच्या दुरावस्थेवरून विरोधी पक्षांनी व विशेषत: राष्ट्रवादी कॉँग्रेसने ‘खड्डे विथ सेल्फी’ अभियान राबवून राज्य सरकारला जेरीस आणले होते. खराब रस्त्यांमुळे होणारे लहान-मोठे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने शासनाने खड्डे बुजवावेत अशी मागणीही जोर धरू लागली होती. त्यातूनच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभुमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रमुख राज्यमार्ग व जिल्हामार्गावरील खड्डयांची माहिती मागविली होती. नाशिक जिल्ह्यातून जाणा-या राज्यमार्गाची लांबी १६८० किलोमीटर इतकी असून, प्रमुख जिल्हा मार्ग २५०० किलोमीटरचा आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार सुमारे ३५ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च होणार असून, त्यानुसार ठेकेदाराची नेमणूक करून राज्यमार्गाचे १६६० किलोमीटरचे व प्रमुख जिल्हामार्गाचे २२५२ किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच ज्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास तो वर्षभरात बुजविण्याची जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करण्यात आली आहे. या खड्डेमुक्ती अभियानात फक्त खड्डे बुजविण्याचेच काम हाती घेण्यात आले आहे, मात्र ज्या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ आहे त्या मार्गावरील डांबर निघालेले असेल तर ते या अभियानात दुरुस्त करणे अपेक्षित नाही, त्यासाठी नवीन रस्त्याचे बळकटीकरण हेच गृहीत धरण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक