शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

By admin | Updated: September 10, 2014 01:49 IST

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

महापालिकेत कोणतीही निवडणूक म्हटली की सर्वच पक्षांत कायम इच्छुक असणाऱ्यांचा एक संचच असतो. तो साऱ्याच निवडणुकांना इच्छुक असतो. निवडणुकीत अधिकृत उमेदवारी मिळणे वेगळे असले, तरी अनेकदा केवळ दावेदार राहणे हेदेखील महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. अर्थात, पालिकेत एक जुन्या जाणत्या मंडळींचे एक कोंडाळे आहे. अन्य नवागत मंडळींना मोक्याच्या जागा मिळू देत नाही, हीदेखील भावना आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. किंबहुना महापौरपदासाठी आरक्षण घोषित झाले तेव्हा बडगुजर यांची दावेदारी मानली जात होती. त्यांचे वरिष्ठ पातळीवर संबंध असल्यामुळे विधानसभेसाठी आपले नाव सुचवावे यासाठी अनेक इच्छुकांनी बडगुजर यांच्या नावाला टेकू लावला. त्यामुळे सेनेत बडगुजर यांच्यावरूनही राजी-नाराजीचे वातावरण होते. सकाळी पक्षश्रेष्ठींनी केवळ बडगुजर हेच उमेदवारी दाखल करतील म्हटल्यानंतर शिवसेना कार्यालयात त्याची प्रतिक्रिया उमटली. शैलेश ढगे आणि अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचे किमान अर्ज दाखल करू द्या ही विनवणी नाकारल्याने ते नाराज झाले. असाच प्रकार भाजपातही झाला. वसंत स्मृती येथे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत गटनेता संभाजी मोरूस्कर यांना उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यास सांगितल्यानंतर कमलेश बोडके यांच्यासह काही नगरसेवकांनी ओरड केली. प्रस्थापित नगरसेवक पदांची अदलाबदल करून पदे घेतात; आता उपमहापौर सतीश कुलकर्णी पदावरून उतरल्यावर त्यांना गटनेता करणार का, असा प्रश्न त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर बंड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर फुलावती बोडके, सिंधू खोडे आणि ज्योती गांगुर्डे यांचे अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. कॉँग्रेसमध्ये उपमहापौरपदासाठी राहुल दिवे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्याचा ‘आदेश’ श्रेष्ठींनी दिल्यानंतर सारीच पदे एका व्यक्तीला देणार काय म्हणत अन्य काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे लक्ष्मण जायभावे, विमल पाटील यांना अर्ज दाखल करू देण्यात आला. मनसेत तर राज ठाकरे यांच्याच आदेशाला बगल देण्यात आली. महापौरपदासाठी संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून पाच ते सहा जणांना नाशिकमध्ये धाडण्यात आले होते. ‘रामायण’वर ही मंडळी पोहोचली व बैठक झाली. त्यानंतर सभागृह नेता शशिकांत जाधव आणि सुदाम कोंबडे या दोघांचेच अर्ज दाखल करण्याचे आदेश आले होते. परंतु ऐनवेळी आधी अशोक मुर्तडक यांचाही अर्ज दाखल करण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मग, मुर्तडकच सलीम शेख यांचाही अर्ज का भरत नाही, असा प्रश्न करीत त्यांचे एक नाव पुढे करण्यात आले. पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी असा प्रकार केल्याने अन्य इच्छुकांना नाराजी जाहीर करता आली नाही आणि आल्या पावली मुंबईत कॅम्पसाठी परतावे लागले. उमेदवारी कोणा तरी एकाला मिळणार, त्यासाठी संबंधित इच्छुक वरील नेते कसे मॅनेज करतात, यावर सारे ठरलेले असते. परंतु नेहमी डावलल्या जाणाऱ्यांच्या भावनांना वेळीच आवर घातला नाही तर कधी ना कधी त्याचा स्फोट होणारच.- संजय पाठक