शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

By admin | Updated: September 10, 2014 01:49 IST

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

महापालिकेत कोणतीही निवडणूक म्हटली की सर्वच पक्षांत कायम इच्छुक असणाऱ्यांचा एक संचच असतो. तो साऱ्याच निवडणुकांना इच्छुक असतो. निवडणुकीत अधिकृत उमेदवारी मिळणे वेगळे असले, तरी अनेकदा केवळ दावेदार राहणे हेदेखील महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. अर्थात, पालिकेत एक जुन्या जाणत्या मंडळींचे एक कोंडाळे आहे. अन्य नवागत मंडळींना मोक्याच्या जागा मिळू देत नाही, हीदेखील भावना आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. किंबहुना महापौरपदासाठी आरक्षण घोषित झाले तेव्हा बडगुजर यांची दावेदारी मानली जात होती. त्यांचे वरिष्ठ पातळीवर संबंध असल्यामुळे विधानसभेसाठी आपले नाव सुचवावे यासाठी अनेक इच्छुकांनी बडगुजर यांच्या नावाला टेकू लावला. त्यामुळे सेनेत बडगुजर यांच्यावरूनही राजी-नाराजीचे वातावरण होते. सकाळी पक्षश्रेष्ठींनी केवळ बडगुजर हेच उमेदवारी दाखल करतील म्हटल्यानंतर शिवसेना कार्यालयात त्याची प्रतिक्रिया उमटली. शैलेश ढगे आणि अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचे किमान अर्ज दाखल करू द्या ही विनवणी नाकारल्याने ते नाराज झाले. असाच प्रकार भाजपातही झाला. वसंत स्मृती येथे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत गटनेता संभाजी मोरूस्कर यांना उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यास सांगितल्यानंतर कमलेश बोडके यांच्यासह काही नगरसेवकांनी ओरड केली. प्रस्थापित नगरसेवक पदांची अदलाबदल करून पदे घेतात; आता उपमहापौर सतीश कुलकर्णी पदावरून उतरल्यावर त्यांना गटनेता करणार का, असा प्रश्न त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर बंड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर फुलावती बोडके, सिंधू खोडे आणि ज्योती गांगुर्डे यांचे अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. कॉँग्रेसमध्ये उपमहापौरपदासाठी राहुल दिवे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्याचा ‘आदेश’ श्रेष्ठींनी दिल्यानंतर सारीच पदे एका व्यक्तीला देणार काय म्हणत अन्य काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे लक्ष्मण जायभावे, विमल पाटील यांना अर्ज दाखल करू देण्यात आला. मनसेत तर राज ठाकरे यांच्याच आदेशाला बगल देण्यात आली. महापौरपदासाठी संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून पाच ते सहा जणांना नाशिकमध्ये धाडण्यात आले होते. ‘रामायण’वर ही मंडळी पोहोचली व बैठक झाली. त्यानंतर सभागृह नेता शशिकांत जाधव आणि सुदाम कोंबडे या दोघांचेच अर्ज दाखल करण्याचे आदेश आले होते. परंतु ऐनवेळी आधी अशोक मुर्तडक यांचाही अर्ज दाखल करण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मग, मुर्तडकच सलीम शेख यांचाही अर्ज का भरत नाही, असा प्रश्न करीत त्यांचे एक नाव पुढे करण्यात आले. पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी असा प्रकार केल्याने अन्य इच्छुकांना नाराजी जाहीर करता आली नाही आणि आल्या पावली मुंबईत कॅम्पसाठी परतावे लागले. उमेदवारी कोणा तरी एकाला मिळणार, त्यासाठी संबंधित इच्छुक वरील नेते कसे मॅनेज करतात, यावर सारे ठरलेले असते. परंतु नेहमी डावलल्या जाणाऱ्यांच्या भावनांना वेळीच आवर घातला नाही तर कधी ना कधी त्याचा स्फोट होणारच.- संजय पाठक