शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक घरपट्टीवाढीबाबत संभ्रम

By admin | Updated: February 21, 2016 22:35 IST

येवला : अपिलीय समिती स्थापन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दत्ता महाले येवलायेवला नगरपालिकेने शहरातील १९९४ पूर्वीच्या इमारतींना वार्षिक भाडे अंदाजी आकारून तर सन १९९४ नंतरच्या इमारतींना भांडवलीमूल्यावर आधारित कर आकारणी न करता चौरस मीटरप्रमाणे घरगुती आणि वाणिज्य वापरासाठीच्या कर दरानुसार घरपट्टी आकारली आहे. पालिका मार्चअखेर१०० टक्के वसुलीचा फंडा वापरत असली तरी शहरवासीयांना ही घरपट्टीवाढ अन्यायकारक वाटत आहे. घरपट्टीबाबत नगर परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या तू तू मै मैच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.याविरोधात केवळ तीस टक्के घरपट्टी भरून या प्रकरणी अपिलीय समितीकडे दाद मागणार असल्याची भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे. दरम्यान, पालिकेने या प्रकरणी अपिलीय समितीचे गठन व्हावी म्हणून, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या समितीच्या गठणानंतर, काही अशी घरपट्टी कमी होईल या आशेवर शहरवासीय आहेत.नगरपरिषदेला कायद्यानुसार चार वर्षांनी मालमत्ता करामध्ये सुधारणा करावी लागते. त्यानुसार सुधारणा होणे अपेक्षति होते. परंतु त्यावेळी भांडवली मूल्यावर कर आकारणी जाचक स्वरु पाची असल्याने ती रद्द करून प्रचिलत पद्धतीनुसार वाढ करण्यास पालिकेने मंजुरी दिली होती. यानुसार सन २०१५-१६ मध्ये सुधारणा करण्यात येऊन २५ ते ४० टक्के पर्यत घरपट्टीत वाढ केली आहे.शहर हद्दीतील १२ हजार घर,जागा,व स्थावर मालमत्ता यांचे भोगवाटदार,व घर मालक यांनी पैकी केवळ२५० नागरिकांनी या वाढीबाबत मुख्याधिकारी यांचेकडे दाद मागितली आहे.नगरपरिषदेने घर पट्टी आकारणी करून त्यावर बर्याच घरमालक नागरिकांनी लेखी व तोंडी अपील दाखल केलेले असतानाही, बदल झालेला नाही. मनमाड नगरपरिषदेचा अंतिम चतुर्थ वार्षिक कर आकारणी नुकतीच झालेली असुन त्यांनी जुन्या इमारतीवर वार्षिक भाडे अंदाजावर वाढ केली तर नवीन बांधकामावर भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारली आहे.येवले न.पा. ने केलेली वाढ ही अवास्तव असल्याचा पवित्र भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. पालिकेने नागरिकांना यावाढीवर हरकतीसाठी पर्याय उपलब्ध करून दिला होता. नागरिकांनी घरपट्टीसाठी ३० टक्के रक्कम जरी पालिकेत भरली तरी शासनाचे सोफ्टवेअर उर्वरित रक्कम थकबाकी असल्याचे दाखवत आहे. अवास्तव केलेली वाढ काही अंशी कमी करून सर्वच जनतेला दिलासा द्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या आकारणीत मागील वर्षाचा फरक वसूल करताना कमी होणारी रक्कम ही पुढील वर्षासाठी आगावू जमा करण्यात यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.