शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

सायबर सुरक्षेविषयी पुणे विद्यापीठ बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:45 IST

देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या घटनेनंतर विद्यापीठाच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, मात्र यातून धडा न घेता ‘चोरी तर होणारच...’ या दृष्टिकोनातून विद्यापीठ हे सर्व प्रकरण हाताळत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाशिक : देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या घटनेनंतर विद्यापीठाच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, मात्र यातून धडा न घेता ‘चोरी तर होणारच...’ या दृष्टिकोनातून विद्यापीठ हे सर्व प्रकरण हाताळत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.  देशात एनआरएफ रँकिंगमध्ये नवव्या क्र मांकावर असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्व परीक्षा आॅनलाइन पद्धतीने करण्यावर भर देत आहे. सध्या बीए, बी.कॉम, एम. कॉम, बीएससी, एमएससी, विधी, अभियांत्रिकी, एमबीए आदी शाखांच्या परीक्षा सुरू असून, सर्व प्रश्नपत्रिका संकेतस्थळाद्वारेच आॅनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांना पाठविल्या जात आहेत. याचाच फायदा घेऊन अभियांत्रिकीच्या दोघा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील ई-मेल हॅक करून बीएससीच्या द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फोडला होता. या दोघा उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षा पद्धतीलाच खिंडार पाडल्याने सायबर सुरक्षेचा गंभीर मुद्दा समोर आला.  त्याचबरोबर विद्यापीठाकडून नियमित सायबर सिक्युरिटी आॅडिट केले जात काय? विद्यापीठ व महाविद्यालय यांच्याशी निगडित असलेले संकेतस्थळ आणि ई-मेल यांना एनआयसी प्रमाणपत्र आहे काय? जर शिकाऊ विद्यार्थी संकेतस्थळ हॅक करू शकतात, तर मग मुत्सद्दी हॅकर्स असे करू शकणार नाहीत याची काय शाश्वती?  असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याविषयी जेव्हा विद्यापीठाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी, ‘आम्ही याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळून असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ‘तुमच्याकडे एखादी वस्तू असेल तर ती चोरीला जाणारच’ असेही म्हटले. विद्यापीठाच्या या बेफिकीर भूमिकेमुळे विद्यापीठ त्यांच्या सायबर सुरक्षेबद्दल किती गंभीर आहे, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या विद्यापीठ आॅनलाइन परीक्षा पद्धतीवर अधिक भर देताना दिसत आहे. अशात सायबर सुरक्षेबद्दलही पुरेशा उपाययोजना करणे गरजेचे असूून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही यादृष्टीने विद्यापीठाने आयटी विभाग आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचा सूर विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.आॅडिट नावालाच...पुणे विद्यापीठाच्या आयटी विभागाकडून सायबर सुरक्षा आॅडिट नियमितपणे केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ते नावालाच असल्याचे समोर आले आहे. कारण या प्रकरणात जे वेब मेल पेज हॅक करण्यात आले, त्याचे सॉफ्टवेअर विद्यापीठाने २०११ पासून अपडेटच केले नव्हते. ‘राउंड क्यूब’ नावाचे हे सॉफ्टवेअर असून, त्याचा पासवर्डही खूपच सोपा होता. (उदा. १२३४५) हे सॉफ्टवेअर अपडेट केले नसल्याने हॅकर्सला ते स्कॅन करणे सहज शक्य झाले. विद्यापीठाने आॅडिटमध्ये या सॉफ्टवेअरवर काम केले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता.

 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ