शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

गावाने घडविले एकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:50 IST

नांदूरवैद्य : : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात.

ठळक मुद्देस्पर्धकांना बक्षिसे तसेच मंडळाचे प्रमाणपत्र अध्यक्षांच्या हस्ते अखेरच्या दिवशी वितरित करण्यात येते.

किसन काजळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात.नांदूरवैद्य या गावामध्ये शिवजयंती उत्सव हा ‘एक गाव, एक शिवजयंती’ या संकल्पनेनुसार अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या दोन मंडळांच्या वतीने साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव यावर्षी पहिल्यांदाच ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार एकत्र साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्याच वर्षी जय बजरंग क्रीडा मंडळ व भैरवनाथ महाराज मित्रमंडळाच्या दोन्हीही अध्यक्षांनी एकमताने ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय घेण्यात येऊन ‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व गणेश भक्तांनी नांदूरवैद्यच्या राजाची स्थापनाकेली.दहा दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा, खो-खो स्पर्धा, लिंबू चमचा, गायन, निबंध स्पर्धा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन या स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या स्पर्धकांना बक्षिसे तसेच मंडळाचे प्रमाणपत्र अध्यक्षांच्या हस्ते अखेरच्या दिवशी वितरित करण्यात येते.या गणेशोत्सव काळात दहाही दिवस गावामध्ये प्रसादाचे वाटप केले जाते. सकाळ, संध्याकाळ वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात येते. रात्रीच्या आरतीप्रसंगी लहान मुलांच्या तसेच ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी नृत्याविष्काराची जुगलबंदी तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात.यानंतर शेवटच्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्र म सादर करण्यात येऊन सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यानंतर चार वाजता संपूर्ण गावातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये गणेश मंडळाचे स्वयंसेवक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीवर लक्ष ठेवून असतात. या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चलचित्र देखावा साकारण्यात येत असल्यामुळे हा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरते. सदर देखावा पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला गावकऱ्यांची मोठी गर्दी होत असते.यावर्षी शिवचरित्रकार सागर महाराज दिंडे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. उत्सव आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावकºयांना निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून या  सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. यामुळेच दिवसेंदिवस सार्वजनिक मंडळांची संख्या जशी वाढत आहे तशीच सार्वजनिक गणपतींच्याही संख्येत वाढ होऊ लागली आहे.गावातील सर्वधर्मीयांमध्ये एकोपा राहावा तसेच जातीय सलोख्याच्या माध्यमातून गावात शांतता नांदावी यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवित असल्याचे यावेळी नांदूरवैद्य येथील जय बजरंग क्रीडा मंडळ व भैरवनाथ महाराज मित्रमंडळाच्या दोन्हीही अध्यक्षांनी यावेळी सांगितले असून, या संकल्पनेचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने एकमताने स्वीकार करण्यात आला आहे. गावकरी मोठ्या आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतात.‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पने मुळे गावामध्ये शांततेचे वातावरण तयार होण्यास मदत होईल तसेच दोन्हीही मंडळांच्या गणपती उत्सवाच्या खर्चाला फाटा देत तो खर्च एकाच सार्वजनिक गणेश उत्सवासाठी खर्च केला जातो. उर्वरित रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च केली जाणार आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना या माध्यमातून शालेय साहित्य देऊन मदत करण्यात येणार आहे. यामुळे गावात सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल.- संदीप काजळे,अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नांदूरवैद्य