शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

शहरात अघोषित वीज भारनियमन

By admin | Updated: October 3, 2015 22:53 IST

लपंडाव सुरूच : अधिकाऱ्यांकडून मात्र सारवासारव

नाशिक : शहरात मुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव हा अघोषित भारनियमनाचा प्रकार असल्याचे वृत्त आहे. नागरिकांची ओरड होऊ नये यासाठी अधिकृतरीत्या तसे जाहीर केले जात नसून नागरिकांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राज्यातील जलाशयांमध्ये अपुरा साठा असल्याने उन्हाळ्यात जलविद्युत केंद्रात विद्युत निर्मितीच्या अडचणी येतात. या काळात विजेची मागणीही वाढत असल्याने विजेची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे भारनियमन होते हे स्वाभाविक असले तरी, सध्या पावसाळा अद्याप खऱ्या अर्थाने संपलेला नसताना आताच महावितरणला वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, काही भागात विजेची ये-जा सुरू असते. तर काही भागात अनेक तास वीज गायब असते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दूरध्वनी न उचलणे किंवा वास्तविक कारणे न सांगणे नेहमीचेच झाले आहे. तथापि, मिळालेल्या माहितीनुसार आता अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वीज भारनियमन करण्यापूर्वी केवळ भ्रमणध्वनीवरून वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना केली जाते आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित केला जातो.नागरिकांचा भारनियमनालाही विरोध नाही, मात्र तसे जाहीर केले, तर त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होेते. विशेषत: व्यावसायिक, रुग्णालये आणि उद्योजकांना त्यानुसार कामाचे वेळापत्रक ठरविता येते, त्यामुळे भारनियमन असेलच तर तसे अगोदरच घोषित करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)