शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

शहरात अघोषित वीज भारनियमन

By admin | Updated: October 3, 2015 22:53 IST

लपंडाव सुरूच : अधिकाऱ्यांकडून मात्र सारवासारव

नाशिक : शहरात मुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव हा अघोषित भारनियमनाचा प्रकार असल्याचे वृत्त आहे. नागरिकांची ओरड होऊ नये यासाठी अधिकृतरीत्या तसे जाहीर केले जात नसून नागरिकांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राज्यातील जलाशयांमध्ये अपुरा साठा असल्याने उन्हाळ्यात जलविद्युत केंद्रात विद्युत निर्मितीच्या अडचणी येतात. या काळात विजेची मागणीही वाढत असल्याने विजेची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे भारनियमन होते हे स्वाभाविक असले तरी, सध्या पावसाळा अद्याप खऱ्या अर्थाने संपलेला नसताना आताच महावितरणला वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, काही भागात विजेची ये-जा सुरू असते. तर काही भागात अनेक तास वीज गायब असते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दूरध्वनी न उचलणे किंवा वास्तविक कारणे न सांगणे नेहमीचेच झाले आहे. तथापि, मिळालेल्या माहितीनुसार आता अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वीज भारनियमन करण्यापूर्वी केवळ भ्रमणध्वनीवरून वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना केली जाते आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित केला जातो.नागरिकांचा भारनियमनालाही विरोध नाही, मात्र तसे जाहीर केले, तर त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होेते. विशेषत: व्यावसायिक, रुग्णालये आणि उद्योजकांना त्यानुसार कामाचे वेळापत्रक ठरविता येते, त्यामुळे भारनियमन असेलच तर तसे अगोदरच घोषित करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)