शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

शहरात अघोषित वीज भारनियमन

By admin | Updated: October 3, 2015 22:53 IST

लपंडाव सुरूच : अधिकाऱ्यांकडून मात्र सारवासारव

नाशिक : शहरात मुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव हा अघोषित भारनियमनाचा प्रकार असल्याचे वृत्त आहे. नागरिकांची ओरड होऊ नये यासाठी अधिकृतरीत्या तसे जाहीर केले जात नसून नागरिकांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राज्यातील जलाशयांमध्ये अपुरा साठा असल्याने उन्हाळ्यात जलविद्युत केंद्रात विद्युत निर्मितीच्या अडचणी येतात. या काळात विजेची मागणीही वाढत असल्याने विजेची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे भारनियमन होते हे स्वाभाविक असले तरी, सध्या पावसाळा अद्याप खऱ्या अर्थाने संपलेला नसताना आताच महावितरणला वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, काही भागात विजेची ये-जा सुरू असते. तर काही भागात अनेक तास वीज गायब असते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दूरध्वनी न उचलणे किंवा वास्तविक कारणे न सांगणे नेहमीचेच झाले आहे. तथापि, मिळालेल्या माहितीनुसार आता अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वीज भारनियमन करण्यापूर्वी केवळ भ्रमणध्वनीवरून वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना केली जाते आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित केला जातो.नागरिकांचा भारनियमनालाही विरोध नाही, मात्र तसे जाहीर केले, तर त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होेते. विशेषत: व्यावसायिक, रुग्णालये आणि उद्योजकांना त्यानुसार कामाचे वेळापत्रक ठरविता येते, त्यामुळे भारनियमन असेलच तर तसे अगोदरच घोषित करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)