शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:13 IST

अपंग संवर्गातील कर्मचाºयांच्या सार्वत्रिक बदल्या न केल्याचा ठपका कक्ष अधिकाºयावर ठेवून खातेप्रमुखांना अभय देण्याच्या प्रकरणाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, एकीकडे कर्मचाºयांनी खातेप्रमुखांचे न ऐकता आपलेच आदेश पाळावे, असा मौखिक फतवा काढणारे मुख्य कार्यकारी अधिकारी अपंग कर्मचाºयांच्या बदल्यांची स्वत:वर जबाबदारी घेतील काय? असा सवाल केला जात आहे.

नाशिक : अपंग संवर्गातील कर्मचाºयांच्या सार्वत्रिक बदल्या न केल्याचा ठपका कक्ष अधिकाºयावर ठेवून खातेप्रमुखांना अभय देण्याच्या प्रकरणाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, एकीकडे कर्मचाºयांनी खातेप्रमुखांचे न ऐकता आपलेच आदेश पाळावे, असा मौखिक फतवा काढणारे मुख्य कार्यकारी अधिकारी अपंग कर्मचाºयांच्या बदल्यांची स्वत:वर जबाबदारी घेतील काय? असा सवाल केला जात आहे.  मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या सार्वत्रिक बदल्या करताना सामान्य प्रशासन विभागाने अपंग संवर्गातील कर्मचाºयांच्या बदल्यांचा प्रस्ताव तयार केला नाही त्यामुळे सार्वत्रिक बदल्यांमध्ये अपंग कर्मचाºयांना वगळण्यात आल्याची तक्रार एका कर्मचाºयाने थेट अपंग कल्याण आयुक्तांकडे केली होती. या प्रकरणात सामान्य प्रशासन विभाग सारवासारव करण्याचा प्रयत्नात असतानाच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेला अपंगांच्या प्रश्नावर भेट देण्याचे जाहीर केले, त्यामुळे गर्भगळीत झालेल्या प्रशासनाने रातोरात दोघा अपंग कर्मचाºयांच्या बदल्यांचे आदेश सप्टेंबर महिन्यात काढले व या साºया प्रकरणाचे खापर सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी सदाशिव बारगळ यांच्यावर फोडून त्यांना शिक्षा म्हणून तडकाफडकी शिक्षण विभागात बदली करण्यात आली.  मुळात कर्मचाºयांच्या बदल्यांचा विषय जरी सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील असला तरी, एकट्या कक्ष अधिकाºयाची ती जबाबदारी नाही, त्यासाठी खातेप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकाºयांची मुख्य जबाबदारी आहे. असे असतानाही कक्ष अधिकाºयाची बदली करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याच्या प्रशासनाच्या एकतर्फी कारवाईमुळे समस्त कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सामान्य कर्मचाºयांच्या बळी देताना खातेप्रमुखांना अभय देण्यामागचे कारण जाहीर झालेले नसले तरी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या एकूणच कामकाजाची पद्धती व वर्तन पाहता, त्यांची ‘मर्जी’ राखणाºयांना जिल्हा परिषदेत ‘अच्छे दिन’ असल्याची खुली आम होणाºया चर्चेला यानिमित्ताने पृष्टी मिळाली आहे.  कर्मचाºयांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या काही खाते प्रमुखांमध्येही याच विषयांवरून अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी खाते प्रमुखांसमोरच त्यांच्या कर्मचाºयांना ‘खाते प्रमुखांचे ऐकू नका मी सांगतो तसे करा’ असे आदेश देत असताना दुसरीकडे मग कर्मचाºयांकडून झालेल्या चुकीच्या कामकाजाबद्दल मात्र खाते प्रमुखांना जबाबदार धरण्याचा उफराटा प्रकार वारंवार घडू लागल्याने अधिकाºयांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.शासकीय वाहनाचा खासगी वापरजिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना शासनाने वाहन पुरविलेले असतानाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे खासगी कामासाठी वापरल्या जाणाºया ‘इनोव्हा’ मोटारीच्या परजिल्ह्यातील भ्रमंतीच्या चर्चेनेही जोर धरला आहे. सदर मोटार मासिक भाड्याने जिल्हा परिषदेच्या सेवेसाठी वापरण्यासाठी शासनाने मुभा दिलेली असली तरी, सदरचे वाहन अनेक वेळा शहरातील मॉल, फिटनेस क्लब याठिकाणी तासन्तास उभे असते. बºयाच वेळा जिल्ह्याची सीमा ओलांडून या मोटारीचा होणारा प्रवास नेमका कोणासाठी होतो व या मोटारीचे भाडे कोणत्या हेडखालून अदा केले जाते, असा सवाल पदाधिकारीही विचारू लागले आहेत. हे कमी की काय म्हणून अलीकडेच स्वच्छ भारत अभियानासाठीची तीन वाहनेही पुन्हा खास आदेशाने अन्यत्र वळते करून घेण्यात आल्याचा छातीठोक दावा जिल्हा परिषदेच्या चालकांनी केला असून, यासंदर्भात संबंधित अधिकाºयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.