शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

त्र्यंबक नाका सिग्नलवर अनधिकृत थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST

रात्री उशिरापर्यंत लॉन्स सुरूच नाशिक : वडाळा नाका, तसेच अशोका मार्गवारील लग्न सोहळ्यासाठीचे हॉल आणि लॉन्स रात्री उशिरापर्यंत सुरू ...

रात्री उशिरापर्यंत लॉन्स सुरूच

नाशिक : वडाळा नाका, तसेच अशोका मार्गवारील लग्न सोहळ्यासाठीचे हॉल आणि लॉन्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या ठिकाणी होणाऱ्या लग्न सेाहळ्यासाठी गर्दीच्या नियमांचे उल्लंघन होत असून, वाहनेही रस्त्यावरच उभी केली जात असल्याने, अन्य वाहनांना मार्ग काढणे कठीण होते.

गडकरी चौकातील दुभाजक धोक्याचे

नाशिक: सारडा सर्कलकडून गडकरी चौकात येणारी वाहने सीबीएसकडून येणाऱ्या वाहनधारकांना दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी या चौकात पहाटेच्या सुमारास कारचा अपघात होऊन काहीना जीव गमवावा लागला होता. दुभाजकातील दाट झाडेझुडपांमुळे पलीकडील वाहने दिसत नसल्याची तक्रार आहे.

कोणार्कनगर कॉर्नर चौकात कोंडी

नाशिक : कोणार्कनगर-दसक चौकातील उड्डाणपुलाखाली वाहतुकीची कोंडी नेहमीचीच समस्या बनली आहे. चौकात वाहनांची कोंडी होत असल्याने, वाहनांच्या लांबच लांग रांगा लागत आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी चौकात वाहतूक पोलीस नियुक्त नसल्यामुळे विस्कळीत वाहतुकीमुळे कोंडीत अधिकच भर पडते.

जूने सीबीएसला प्रवाशांची गैरसोय

नाशिक: जुने सीबीएस येथील बस स्थानकात बसप्लॅटफॉर्म आणि प्रवाशांसाठी बसण्यासाठीची जागा योग्य नसल्याने, भव्य स्थानकही बकाल झाले आहे. स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी सुसज्ज जागा करून दिली आणि समोरच्या जागेच बसेस उभ्या केल्या, तर प्रवाशांची सोय होऊ शकते. सध्या स्थानकाच्या समोर प्रवाशी उभे राहून बसेसचे फलक बघत असतात.

रेल्वे मालधक्का रस्ता धोकादायक

देवळाली गाव : देवळाली गाव राजवाडा येथील मालधक्का धोकादायक बनला आहे. रहिवासी क्षेत्रातून जाणारा हा मार्ग असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अरुंद रस्ता आणि त्याततच रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे, तर काही ठिकाणी रस्त्याचे रस्त्याचे साइडपट्टा खराब झाल्या आहेत. अशा मार्गावरून होणारी अवजड वाहतूक धोकादायक ठरत आहे.

स्टेट बँक चौकात अनधिकृत भाजीबाजार ना

शिकरोड : येथील रेजिमेंटलसमोरील मशीद रोड, तसेच स्टेटबँक चौक येथील अंतर्गत रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे गर्दी वाढत आहे. बाजारातील गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने या मार्गावरील बाजाराला आळा घालण्याची मागणी होत आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे रस्त्याच्या कडेला बसलेले विक्रेते, ग्राहकांची वाहने, तसेच स्थानिक दुकानदारांची वाहने, यामुळे या ठिकाणी गर्दी होत आहे.