शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

निमाणी बसस्थानकासमोर अनधिकृत रिक्षाथांबा

By admin | Updated: April 26, 2015 23:11 IST

अपघातांत वाढ : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

पंचवटी : निमाणी बसस्थानकासमोरील रस्त्यावर काही रिक्षाचालकांनी अनधिकृतपणे रिक्षाथांबा केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. बसस्थानकासमोर असलेल्या या अनधिकृत रिक्षाथांब्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने कारवाई करणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. जुना आडगाव नाका ते निमाणी बसस्थानक रस्ता-दिंडोरी नाका या परिसरात वाहनांची कायमच वर्दळ असते. बसस्थानकासमोर असलेल्या सूर्या हॉस्पिटल रस्त्यावर अनेक रिक्षाचालक रिक्षा उभ्या करून प्रवासी भरतात. यामुळे निमाणी बसस्थानकातून बस बाहेर नेताना चालकांना अडथळा निर्माण होतो. त्यातच संबंधित रिक्षाचालकांना रिक्षा पुढे घेण्यास सांगितले असता ते वाद घालतात. थांबा नसताना भर रस्त्यात रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या रिक्षाचालकांविरुद्ध वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असून, परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलीस या रिक्षाचालकांकडे लक्ष केंद्रित करतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)