शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मराठवाडा पाटबंधारे खात्याचे विनास्वाक्षरी स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:03 IST

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींची पूर्तता करण्याचा एकीकडे आग्रह धरताना दुसरीकडे मंगळवारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पाणी सोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या कार्यकारी संचालकांना मात्र स्मरणपत्रावर स्वत:च्या स्वाक्षरी करण्याचा विसर पडला आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांत दुसरे पत्र : पाणी सोडण्यासाठी दबाव

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींचीपूर्तता करण्याचा एकीकडे आग्रह धरताना दुसरीकडे मंगळवारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पाणी सोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या कार्यकारी संचालकांना मात्र स्मरणपत्रावर स्वत:च्यास्वाक्षरी करण्याचा विसर पडला आहे.कार्यकारी संचालकांनी नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना या संदर्भात पत्र पाठविले असून, त्यात महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, उच्च न्यायालयातील जनहित याचिका व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने मंगळवारी पाणी सोडण्याबाबत दिलेल्या पत्राचा हवाला देत अद्यापही पाणी सोडण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.कार्यकारी संचालकांच्या या स्मरणपत्रावर मात्र त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याने या पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विनास्वाक्षरी पत्र पाठवून पाणी सोडण्यासाठी कार्यकारी संचालकांनी टाकलेल्या दबावामुळे विभागीय आयुक्त नाराज झाल्याचे सांगण्यात आले. उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्यास शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, शेतकरी व नागरिकांकडून होत असलेला विरोध पाहता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यात यावा तसेच पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर बंधाºयांवरील निडल्स काढून टाकाव्यात अशा प्रकारच्या डझनभर सूचना या पत्रात विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत व येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावे अन्यथा महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मधील कलम क्रमांक २६ नुसार कारवाई होऊ शकते याची आठवणही करून दिली आहे.