शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

उमराणेतील परसुल धरण कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 14:22 IST

उमराणे : उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या येथील परसुल धरणातील पाण्याने तळ गाठल्याने नागरिकांची चिंता वाढली असून यापुढील काळात या भागातील जनतेस तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

उमराणे : उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या येथील परसुल धरणातील पाण्याने तळ गाठल्याने नागरिकांची चिंता वाढली असून यापुढील काळात या भागातील जनतेस तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. उमराणे येथे ब्रिटिशकालीन परसुल धरण असुन या धरणातील पाण्यावर उमराणे व परिसरातील तिसगाव, दहिवड, रामवाडी आदी गावांसाठी पेयजल योजना कार्यान्वित आहे. परंतु चालुवर्षी तालुक्याच्या पुर्व भागासह धरण परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे.परिणामी मागील वर्षीच्या आरक्षीत कोट्यातील शिल्लक असलेल्या पाण्यावरच चालुवर्षीच्या पिण्याच्या पाण्याचे अत्यंत काटकसरीने आतापर्यंत नियोजन सुरु होते. शिवाय उपलब्ध साठ्यातुन गेल्या मिहनाभरापासुन परिसरातील सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, तिसगाव, वर्हाळे, खारीपाडा आदी गावांसाठी या धरणातुन दररोज पाच ते सहा टॅकरद्वारे दिड ते दोन लाख लिटर पाणी उपसा केला जात होता.परिसरात परसुल धरणाव्यतिरिक्त कुठेही पाणीसाठा शिल्लक नसल्याने येथे दररोज तिन ते चार हजार शेळ्या मेंढ्या व गुरे पाण्याची तहान भागवत होते. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर व सद्यस्थितीत उन्हाची तिव्रता वाढल्याने बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. धरणातील उपलब्ध असलेले पाणी व मृतसाठा बघता गावासाठी जेमतेम पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. शिल्लक पाणी व लोकसंख्या बघता उमराणे गावासाठी दररोज नऊ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु दुष्काळी परिस्थिती तब्बल सहा दिवसाआड अत्यल्प प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर वाड्या वस्त्यावर पाणी पोहचत नसल्याने तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या काही गावांच्या पेयजल योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तालुक्याच्या पुर्व भागातील गावात पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक