शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

अल्टिमेटम ! तर खासगी डॉक्टर जाणार संपावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:29 IST

कोरोना संक्र मणाच्या काळात दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या खासगी डॉक्टरांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सरकारकडून दिली जात आहे. सातत्याने विविध नियम व कायद्याच्या परिपत्रकांचे कागदी घोडे नाचवून सरकार डॉक्टरांना या संकटकाळात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देसरकारी धोरणांविरोधात संतापाची लाट डॉक्टरांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळत असल्याची भावना

नाशिक : कोरोना संक्र मणाच्या काळात दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या खासगी डॉक्टरांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक सरकारकडून दिली जात आहे. सातत्याने विविध नियम व कायद्याच्या परिपत्रकांचे कागदी घोडे नाचवून सरकारडॉक्टरांना या संकटकाळात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.संघटनेची राज्यस्तरीय भूमिका स्पष्ट करताना मंगळवारी (दि.१५) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, या आठवडाभरात सरकारने सामंजस्याने तोडगा न काढल्यास संपूर्ण राज्यात आयएमए द्वारे काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.सरकारकडून कोविड व नॉनकोविड रु ग्णालयांवर सरसकट आणण्यात आलेले विविध निर्बंध आणि त्यांची वाढविली जाणारी मुदत, जैविक कचºयाचे प्रति किलोनुसार आकारले जाणारे दर, आॅक्सिजन व अन्य औषधांच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या किमती आणि राज्य सरकारने ठरवून दिलेले दरपत्रकाची नियमावलीचे हे गणित कुठेही न जुळणारे असून, खासगी रु ग्णालयांवर सरकारी दरपत्रकांची अंमलबजावणी सरकार बंधनकारक कसे करू शकते? असा सवाल चंद्रात्रे यांनी यावेळी केला.सरकारने कोरोना संक्रमण काळात आॅक्सिजन व अन्य औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणणे गरजेचे असताना सरकार खासगी डॉक्टरांवर अंकुश लावून त्यांच्यारु ग्णालयांवर निर्बंध आणण्याचे काम करत असल्याने संपूर्ण राज्यात खासगी डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झालेली आहे, त्यामुळेच राज्यस्तरावर येत्या आठवडाभरात जर सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसण्याशिवाय पर्याय या संकट काळात आता शिल्लक राहिलेला नाही, असेही चंद्रात्रे म्हणाले.दुष्काळात सरकार पाणी महाग करेल का...?दुर्दैवाने राज्यात एखाद्या भागात जर दुष्काळाची स्थिती ओढवली तर त्या भागात सरकार बाटलीबंद पाणी महाग करेल का आता प्रश्न उपस्थित करत या कोरोनाच्या संकटात आॅक्सिजनच्या किमती राज्यभरात भरमसाठ का वाढत आहे यावर सरकारचे अंकुश का नाही प्रतिप्रश्न आयएमएचे डॉक्टर समीर चंद्रात्रे यांनी उपस्थित केला. औद्योगिक क्षेत्राला होणारा आॅक्सिजनचा पुरवठा तत्काळ बंद केला जावा. सरकारने कोरोनाच्या काळात अत्यावश्यक औषधे, पीपीई सूट, मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझरच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.‘मास्क मस्ट’ अभियानआयएमएकडून याअगोदरच षटसूत्री जाहीर करण्यात आली होती. यातील सूचनांचे काटेकोर पालन झाले असले तर कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर फैलाव शहरात आज नसता झाला.महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्र देत प्रत्येकाला मास्कचा सक्तीने वापर करण्यासंदर्भात विनंती केली जाणार आहे. तसेच मास्क न वापरणाºया विरु द्ध कठोरपणे कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.घंटागाडी, सफाई कर्मचारी, सिग्नलवरील पोलीस अशा सर्वच घटकांद्वारे मास्क अनिवार्य आहे याबाबत जनजागृती करणे आता गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेरसुद्धा जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.लॉकडाऊनमध्ये शासनानेकाय साध्य केले?लॉकडाऊन काळात कुठल्या पर्यायी व्यवस्था उभी करण्यावर निर्णय घेतला गेला? लॉकडाऊन उठविण्यापूर्वी कोणती सुसूत्रता व कोरोना संक्र मण रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या गेल्या? असे प्रश्न उपस्थित करत या संक्र मण काळात कोरोनाशी झुंज देणाºया डॉक्टरांशी मात्र सरकार दुजाभाव करत आहे, हे दुर्दैवी असल्याचे चंद्रात्रे म्हणाले....तर शहराची परिस्थिती अधिक बिकट होईलमुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या चार शहरांची अवस्था सध्या बिकट झाली असून, येथे कोरोनाचे संक्र मण तेजीने होताना दिसत आहे, दर दिवशी एक दीड हजार पूर्ण रु ग्ण वाढू लागल्याने शहराची आरोग्यव्यवस्था अत्यंत तणावाखाली आली आहे. अशा स्थितीमध्ये खासगी डॉक्टरांना सरकारने जर काम बंद आंदोलन करण्यास भाग पाडले तर परिस्थिती अधिक भयावह होईल याचा विचार राज्य सरकारने करणे गरजेचे असल्याचे मत चंद्रात्रे यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टरGovernmentसरकार