शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याने सेनेच्या इच्छूकांना बूस्ट

By श्याम बागुल | Updated: September 28, 2019 19:10 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तयारीला लागलेले आहेत

ठळक मुद्देयुती न होण्याचे संकेत : मतदार संघात लागले कामाला इच्छूकांचा मेळावा घेवून ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छूकांचे युतीची घोषणा व जागांच्या वाटपाकडे लक्ष लागून असताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांचा मेळावा घेवून ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केल्याने निवडणुकीसाठी भाजपाबरोबर युती होणार नाही असा समज इच्छूकांमध्ये निर्माण झाला असून, मेळाव्यासाठी मुंबईला गेलेले इच्छूक नाशकात परतल्यानंतर जोमाने प्रचाराला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तयारीला लागलेले आहेत. मेळावे, बैठका घेण्याबरोबरच भेटवस्तूंचे वाटप, सामाजिक,सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजनावर लाखोंचा खर्च करीत आहेत. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची वाट पहात असून, पक्षानेही सर्व इच्छूकांना कामाला लागण्याचे संदेश यापुर्वीच दिले आहेत. असे असले तरी, भाजपा बरोबर युतीची बोलणीही सुरू आहे. त्यामुळे नेमके काय होणार असा प्रश्न इच्छूकांना पडला आहे. युती झाली तर मतदार संघ सुटणार काय आणि सुटला तरी, उमेदवारी मिळणार काय अशा तिहेरी प्रश्नाभोवती ते गुरफटलेले असताना शनिवारी मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व इच्छूक उमेदवारांना पाचारण करून मेळावा घेतला व त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली. एकीकडे भाजपाबरोबर युतीची बोलणी सुरू असल्याचे सांगणाऱ्या ठाकरे यांनी सेना सर्व जागा लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र उभे केल्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाला आहे. त्यांच्या मते युती होण्याची शक्यता मावळल्यानेच ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांना स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयार राहण्याचा संदेश देण्यासाठी मेळावा घेतला आहे. युती होणारच आहे तर ठाकरे यांनी मेळावा न घेता मुंबईतूनच त्याची घोेषणा केली असती किंवा मेळाव्यातच तसे जाहीर करून ज्या इच्छूकांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना बंडखोरी वा प्रतारणा न करण्याचे आवाहन केले असते. मात्र ठाकरे यांनी यापैकी काहीच केले नाही. त्यामुळे युतीबाबत अजुनही अनिश्चितता असल्याचा संदेश ठाकरे यांनी मेळाव्याद्वारे दिला असून, त्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाले आहे. मेळावा आटोपल्यानंतर नाशकात परतलेल्या इच्छूकांनी तेच संकेत समजून जोरदार कामाला लागले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक