शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याने सेनेच्या इच्छूकांना बूस्ट

By श्याम बागुल | Updated: September 28, 2019 19:10 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तयारीला लागलेले आहेत

ठळक मुद्देयुती न होण्याचे संकेत : मतदार संघात लागले कामाला इच्छूकांचा मेळावा घेवून ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छूकांचे युतीची घोषणा व जागांच्या वाटपाकडे लक्ष लागून असताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांचा मेळावा घेवून ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केल्याने निवडणुकीसाठी भाजपाबरोबर युती होणार नाही असा समज इच्छूकांमध्ये निर्माण झाला असून, मेळाव्यासाठी मुंबईला गेलेले इच्छूक नाशकात परतल्यानंतर जोमाने प्रचाराला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तयारीला लागलेले आहेत. मेळावे, बैठका घेण्याबरोबरच भेटवस्तूंचे वाटप, सामाजिक,सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजनावर लाखोंचा खर्च करीत आहेत. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची वाट पहात असून, पक्षानेही सर्व इच्छूकांना कामाला लागण्याचे संदेश यापुर्वीच दिले आहेत. असे असले तरी, भाजपा बरोबर युतीची बोलणीही सुरू आहे. त्यामुळे नेमके काय होणार असा प्रश्न इच्छूकांना पडला आहे. युती झाली तर मतदार संघ सुटणार काय आणि सुटला तरी, उमेदवारी मिळणार काय अशा तिहेरी प्रश्नाभोवती ते गुरफटलेले असताना शनिवारी मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व इच्छूक उमेदवारांना पाचारण करून मेळावा घेतला व त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली. एकीकडे भाजपाबरोबर युतीची बोलणी सुरू असल्याचे सांगणाऱ्या ठाकरे यांनी सेना सर्व जागा लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र उभे केल्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाला आहे. त्यांच्या मते युती होण्याची शक्यता मावळल्यानेच ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांना स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयार राहण्याचा संदेश देण्यासाठी मेळावा घेतला आहे. युती होणारच आहे तर ठाकरे यांनी मेळावा न घेता मुंबईतूनच त्याची घोेषणा केली असती किंवा मेळाव्यातच तसे जाहीर करून ज्या इच्छूकांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना बंडखोरी वा प्रतारणा न करण्याचे आवाहन केले असते. मात्र ठाकरे यांनी यापैकी काहीच केले नाही. त्यामुळे युतीबाबत अजुनही अनिश्चितता असल्याचा संदेश ठाकरे यांनी मेळाव्याद्वारे दिला असून, त्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाले आहे. मेळावा आटोपल्यानंतर नाशकात परतलेल्या इच्छूकांनी तेच संकेत समजून जोरदार कामाला लागले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक