शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

टाईपरायटरची टक टक झाली शांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:22 IST

इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाईपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकिय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परिक्षा संगणकावरुनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाईपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकिय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परिक्षा संगणकावरुनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टाईपरायटरच्या ‘टक-टक’ला पुर्णविराम मिळाला.राज्यातील शासकिय व निमशासकिय कार्यालयांमध्ये लिपिक, टंकलेखक पदावरील नियुक्तीसाठी राज्य परीक्षा परिषदेची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. टाईपरायटर कालबाह्य होणे सहाजिकच होते. त्यामुळे शिक्षण विभागानेही आता यापुढे टंकलेखनाची परीक्षा संगणकावर घेतल्या जाऊन आधुनिक युगाबरोबर चालण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला आहे. २०१३सालीच शासनाने टंकलेखनाची परीक्षा संगणकामार्फत घेण्याचा विचार केला होता; मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल चार वर्षे लोटली. चालू वर्षापासून मात्र टंकलेखनाची परीक्षा संगणकावरुन कायमस्वरुपी घेतली जाणार आहे. १८आॅगस्टपासून टंकलेखनाच्या संगणकीकृत परीक्षेला प्रारंभ होत आहे. टाईपरायटरवरील अखेरची परीक्षा सात आॅगस्टपासून सुरू होती. त्याचा शेवट शनिवारी झाला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधील टंकलेखनाच्या संगणकावरील अभ्यासक्रमामध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. टंकलेखनाची वेगमर्यादाही तेवढीच ठेवण्यात आली आहे.एकूणच संगणकाचे प्रस्थ पुर्णपणे निर्माण होईपर्यंत आपले अस्तित्व टिकविणाºया टाईपरायटरची आता मात्र एक्झिट’ झाल्याने टायपिंग इन्स्टिट्यिूटमध्येही टंकलेखनाचे धडे संगणकावरच दिले जाणार आहे. त्यामुळे संगणकीकृत टायपिंग इन्स्टिट्यूट असे नामकरण होण्याची यापुढे शक्यता आहे. काळानुरूप या बदलाचा स्विकार करणे स्वभाविक आहे. त्यामुळे बहुतांश इन्स्टिट्यूटमध्येही टाईपरायटर यंत्र हे एक संग्रही म्हणून बघावयास मिळणार आहे.