शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

वैजापूरसाठी पाणी पळविण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 23:42 IST

प्रशासन झोपेत : नांदगाव तालुक्यातील कासारीची घटना

नाशिक : पाण्याच्या समन्यायी वाटपाचा मुद्दा उपस्थित करून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी पळविणाऱ्या मराठवाड्याने गोदावरी तर कोरडी केलीच, परंतु नाशिक जिल्ह्यातील झोपेत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेची नजर चुकवून वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नांदगाव तालुक्यातील कासारी येथील धरणातून टॅँकरद्वारे पाणी पळविल्याची बाब मंगळवारी उघडकीस आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांना याची खबर मिळाल्यावर त्यांनी तातडीने वैजापूरसाठी पाणी वाहून नेणारे टॅँकर पिटाळून लावल्याने काही प्रमाणात पाणीचोरी रोखली गेली असली तरी, या पाण्यावर पुन्हा डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा नांदगाव तालुका पिण्याच्या पाण्याच्या टंचाईशी सामना करीत असून, सद्यस्थितीत २१ गावे व १६१ वाड्यांना ३९ टॅँकरद्वारे १२६ फेऱ्यांद्वारे जनतेची पाण्याची तहान भागविली जात आहे. तालुक्यातीलच मनमाड शहराला दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात असून, नांदगाव तालुक्याला वरदान ठरू पाहणाऱ्या नाग्या-साक्या धरणात फक्त मृतसाठा उरला आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता पाहता नांदगाव तालुक्यातील कासारी येथील मध्यम प्रकल्पात अत्यावश्यक बाब म्हणून साडेतीन दशलक्ष घनफूट पाणी प्रशासनाने राखून ठेवले होते. सध्या नांदगाव तालुक्याला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटू लागले असून, पाऊसही लांबणीवर पडल्याने कासारी येथील धरणावरच सारी भिस्त अवलंबून असताना गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर तालुक्यातील २७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅँकरद्वारे पाणी पळविण्यात येत असल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी काही टॅँकर या धरणातून पाणी घेत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीन गटविकास अधिकारी श्रीमती कोठावळे यांच्याशी संपर्क साधून खात्री केली असता, त्यांना धक्काच बसला. कोणत्याही परवानगीविना वैजापूर तालुक्यासाठी धरणातून गेल्या काही दिवसांपासून ५० टॅँकरद्वारे पाणी पळविण्यात येत होते, विशेष म्हणजे धरणातून पाणी उपसण्यासाठी वैजापूरच्या गटविकास अधिकाऱ्याने चार इंजिनही बसविल्याचे उघडकीस आले. नांदगावची जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना तेथील पाण्यावर विनापरवानगी डल्ला मारण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत श्रीमती कोठावळे यांनी तातडीने टॅँकर परत पाठविले आहेत.