शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: धाड पडताच ५०० च्या नोटांचे बंडल इंजिनिअरने खिडकीबाहेर फेकले; पैशांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले
2
शेपूट वाकडं ते वाकडंच! पाक सरकारचे मंत्री, हाफिज सईदचा मुलगा अन् पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड एकाच मंचावर...
3
"पाकिस्तानातून दहशतवादी नव्हे तर मुस्लीम आले अन्..."; ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांचं मोठं विधान
4
भारत आता तो भारत राहिलेला नाही, दहशतवाद नष्ट करणारच!, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये गर्जना
5
हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं
6
Numerology: जूनमध्ये लागणार बंपर लॉटरी! अडकलेले पैसे परत येतील, कमाईचे नवे मार्ग सापडतील!
7
नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण
8
आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट
9
"RCB फायनलमध्ये जिंकली नाही तर मी पतीला घटस्फोट देईन’’, सामन्यावेळी पोस्टर घेऊन आलेल्या महिलेचा फोटो व्हायरल 
10
Corona Virus : "कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?
11
‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’शी बोलताना सांगितला प्रवास
12
प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत
13
पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रास्त्रांचा बार फुसका कसा निघाला? उत्तर देताना चिनी संरक्षण प्रवक्त्यांची उडाली फे फे
14
ATM आणि UPI द्वारे PF चे पैसे कसे काढायचे? जूनपासून प्रक्रिया सुरू! जाणून घ्या...
15
ट्रम्प प्रशासनातून 'बाहेर', पण गरिबीतून अब्जाधीश होण्याचा त्यांचा प्रवास अचंबित करणारा! एका निर्णयाने डाव पलटला
16
३५०० रुपयांसाठी देशाशी गद्दारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाचा मोठा खुलासा
17
"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा
18
मराठी मुलासोबत अमरीश पुरींच्या लेकीने केलंय लग्न, अभिनय क्षेत्रापासून दूर राहून करते हे काम
19
खळबळजनक! दातावर उपचार करणं पडलं महागात; सलाईनच्या १ बॉटलने घेतला ८ जणांचा जीव
20
"शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट

वैजापूरसाठी पाणी पळविण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 23:42 IST

प्रशासन झोपेत : नांदगाव तालुक्यातील कासारीची घटना

नाशिक : पाण्याच्या समन्यायी वाटपाचा मुद्दा उपस्थित करून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी पळविणाऱ्या मराठवाड्याने गोदावरी तर कोरडी केलीच, परंतु नाशिक जिल्ह्यातील झोपेत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेची नजर चुकवून वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नांदगाव तालुक्यातील कासारी येथील धरणातून टॅँकरद्वारे पाणी पळविल्याची बाब मंगळवारी उघडकीस आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांना याची खबर मिळाल्यावर त्यांनी तातडीने वैजापूरसाठी पाणी वाहून नेणारे टॅँकर पिटाळून लावल्याने काही प्रमाणात पाणीचोरी रोखली गेली असली तरी, या पाण्यावर पुन्हा डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा नांदगाव तालुका पिण्याच्या पाण्याच्या टंचाईशी सामना करीत असून, सद्यस्थितीत २१ गावे व १६१ वाड्यांना ३९ टॅँकरद्वारे १२६ फेऱ्यांद्वारे जनतेची पाण्याची तहान भागविली जात आहे. तालुक्यातीलच मनमाड शहराला दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात असून, नांदगाव तालुक्याला वरदान ठरू पाहणाऱ्या नाग्या-साक्या धरणात फक्त मृतसाठा उरला आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता पाहता नांदगाव तालुक्यातील कासारी येथील मध्यम प्रकल्पात अत्यावश्यक बाब म्हणून साडेतीन दशलक्ष घनफूट पाणी प्रशासनाने राखून ठेवले होते. सध्या नांदगाव तालुक्याला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटू लागले असून, पाऊसही लांबणीवर पडल्याने कासारी येथील धरणावरच सारी भिस्त अवलंबून असताना गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर तालुक्यातील २७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅँकरद्वारे पाणी पळविण्यात येत असल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी काही टॅँकर या धरणातून पाणी घेत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीन गटविकास अधिकारी श्रीमती कोठावळे यांच्याशी संपर्क साधून खात्री केली असता, त्यांना धक्काच बसला. कोणत्याही परवानगीविना वैजापूर तालुक्यासाठी धरणातून गेल्या काही दिवसांपासून ५० टॅँकरद्वारे पाणी पळविण्यात येत होते, विशेष म्हणजे धरणातून पाणी उपसण्यासाठी वैजापूरच्या गटविकास अधिकाऱ्याने चार इंजिनही बसविल्याचे उघडकीस आले. नांदगावची जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना तेथील पाण्यावर विनापरवानगी डल्ला मारण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत श्रीमती कोठावळे यांनी तातडीने टॅँकर परत पाठविले आहेत.