शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

नाशिक पेठ रस्त्यावर अपघातात दोन महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2015 22:48 IST

दिंडोरी : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात स्कार्पिओ दरीत कोसळली

 दिंडोरी : नाशिक-पेठ-धरमपूर रस्त्यावर रासेगाव शिवारातील एका अपघातप्रवण जागेजवळ दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओला झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या असून वाहनचालकासह तीन महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त झाल्याल्या स्कॉर्पिओमधून काही भाविक गुजरातमधील चिन धर्म स्थळास भेट देवून परतत होते. नाशिक-पेठ-धरमपूर रस्त्यावर रविवारी दुपारी एका दुचाकीला वाचिवण्याच्या नादात गुजरातमधील चिन धर्म स्थळास भेट देवून नाशिकला परतणाऱ्या भाविकांच्या स्कोर्पिओ गाडीला अपघात होत झाला. या वेळी गाडी पलटी झाल्याने या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. तर पाच जण जखमी झाले आहे . सातपूर येथील एम एच १५ इ एक्स ५५१५ स्कॉर्पिओ गुजरातहून नाशिककडे भरघाव वेगात येत असताना पेठ रस्त्यावर रासेगाव शिवारात ही घटना घडली. समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचिवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ सुमारे चारशे फुट खोल कोसळल्याने गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी चंदाबाई ओमकार थोरात (४६) व त्रिमूर्ती चौक येथील अनिता संजय पाडवी (४०) या दोन महिला जागीच ठार झाल्या . तर सातपूरचा रहिवासी पप्पू पशुपतीनाथ पांडे (३५) पाथर्डी येथील अनुराधा राजू साळुंखे (४२), आशा प्रकाश अहिरे (३५) रा. सातपूर, ख्रिस्तिना प्रमोद भोसले रा. इंदिरानगर या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. जे .शेख हवालदार कदम, खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना गाडी बाहेर काढत नाशिक येथे उपचारासाठी पाठवले असून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

रस्त्याचे रु ंदीकरण, नुतनीकरण करण्याची मागणी

या अपघातस्थळी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून येथे गतिरोधक बसवावे तसेच या रस्त्याचे रु ंदीकरण व नुतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने चालकाकडून खड्डे चुकविण्याच्या नादात सातत्याने अपघातात वाढ होत असून राष्ट्रीय महामार्ग घोषित होवूनही रस्त्याची दुर्दशा थांबलेली नाही. सिहंस्थाच्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी एका दुचाकीला वाचिवण्याच्या नादात संट्रो, आयशर व दुचाकीत अपघात झाल्याने तीन भाविक ठार झाले होते.