शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:18 IST

शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देअपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशीपुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला

नाशिक : शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीतून जाणाºया मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गरवारे पॉइंटपासून ठिकठिकाणी लहान ओव्हरब्रिज तयार करण्यात आले असून, या पुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला आहे, तर प्रकाश हॉटेल ते के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सर्वाधिक सुमारे सहाकिलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावरून रिक्षा, दुचाकी, फाइव्ह व्हिलर या वाहनांना पहिल्या दिवसांपासूनच बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांनी समांतर किंवा पुलाखालील रस्त्याचा वापर करावा, असे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. परंतु असे असतानाही उड्डाणपुलावरून राजरोसपणे दुचाकी, तीनचाकी वाहनांची वर्दळ कायम असून, त्यातून लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मार्च २०१४ मध्ये या उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भरधाव वेगाने जाणाºया दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने दोघे तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती व त्यामुळेच सदरचा निर्णय घेण्यात आला होता. प्रारंभी उड्डाणपुलाचा वापर करणाºया दुचाकी, तीनचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईही केली जात होती. कालांतराने मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर ट्रिपल सीट दुचाकीवरून उड्डाणपुलाचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जात आहे.अपघाताला जबाबदारदोन आठवड्यांपूर्वी भरधाव वेगाने जाणारी दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व वाढत्या अपघाताला वाहतूक पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राष्टय महामार्ग प्राधिकरणाने दुचाकी वाहनांना बंदी घातलेली असताना त्याची अंमलबजावणी मात्र पोलीस करीत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता उड्डाणपुलावर तसेच ज्या ज्या ठिकाणांहून पुलावर वाहनांना चढण्यासाठी सोय करण्यात आली आहे अशा सर्वच ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.

टॅग्स :Accidentअपघात