शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:18 IST

शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देअपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशीपुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला

नाशिक : शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने काढला असून, वाढते अपघात टाळण्यासाठी आता उड्डाणपुलावर ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीतून जाणाºया मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गरवारे पॉइंटपासून ठिकठिकाणी लहान ओव्हरब्रिज तयार करण्यात आले असून, या पुलांचा वापर फक्त चारचाकी व अवजड वाहनांसाठीच अनिवार्य करण्यात आला आहे, तर प्रकाश हॉटेल ते के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सर्वाधिक सुमारे सहाकिलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलावरून रिक्षा, दुचाकी, फाइव्ह व्हिलर या वाहनांना पहिल्या दिवसांपासूनच बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांनी समांतर किंवा पुलाखालील रस्त्याचा वापर करावा, असे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. परंतु असे असतानाही उड्डाणपुलावरून राजरोसपणे दुचाकी, तीनचाकी वाहनांची वर्दळ कायम असून, त्यातून लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मार्च २०१४ मध्ये या उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भरधाव वेगाने जाणाºया दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने दोघे तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती व त्यामुळेच सदरचा निर्णय घेण्यात आला होता. प्रारंभी उड्डाणपुलाचा वापर करणाºया दुचाकी, तीनचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईही केली जात होती. कालांतराने मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा उड्डाणपुलावरून भरधाव वेगात दुचाकीचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर ट्रिपल सीट दुचाकीवरून उड्डाणपुलाचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जात आहे.अपघाताला जबाबदारदोन आठवड्यांपूर्वी भरधाव वेगाने जाणारी दुचाकी कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या सर्व वाढत्या अपघाताला वाहतूक पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राष्टय महामार्ग प्राधिकरणाने दुचाकी वाहनांना बंदी घातलेली असताना त्याची अंमलबजावणी मात्र पोलीस करीत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता उड्डाणपुलावर तसेच ज्या ज्या ठिकाणांहून पुलावर वाहनांना चढण्यासाठी सोय करण्यात आली आहे अशा सर्वच ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.

टॅग्स :Accidentअपघात