शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चाळीसगाव फाट्याजवळ आयशरच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:27 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

ठळक मुद्देमालेगाव येथील घटना : संतप्त जमावाने रोखला महामार्ग

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.  दरम्यान, चंदनपुरी व सवंदगाव शिवारात अपघातांची मालिका वाढल्याने माजी आमदार आसीफ शेख यांनी समर्थकांसह महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी  (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मालेगावकडून चाळीसगावकडे दुचाकी (एमएच १९ बीए ४३५२) वर जाणाऱ्या पंकज पाटीलसह एका महिलेला आयशर (एमएच १८ बीबी ०११७) हिने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. पोलीसांनी आयशर चालक द्रोणागिरी गोसावी (रा. अवधान, जि. धुळे) याला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार कैलास गुजर, हवालदार अक्षय पाटील, सचिन दळवी करीत आहेत.आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेनंतर अपघातातील अन्य एका मृत महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही. या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दुचाकी क्रमांकावरून दाम्पत्य हे चाळीसगाव तालुक्यातील असल्याचे प्रथमदर्शनी  निदर्शनास आले आहे. चंदनपुरी, सवंदगाव, दरेगाव, म्हाळदे शिवारात अपघातांची मालिका वाढली आहे. यामुळे माजी आमदार शेख यांनी चाळीसगाव ते टेहरे फाट्यादरम्यान गतिरोधक बसवावेत. पथदिवे सुरू करावे. झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे मारावेत. सवंदगाव, दरेगाव, म्हाळदेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हायमास्ट बसवावेत. रस्त्याचे सहापदरीकरण करावे आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले.  आंदोलनात माजी नगरसेवक शकील जानीबेग, अज्जूभाई लसूनवाला, राजू इंजिनिअर, रफीक खजूरवाले आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागेया मार्गावर अपघातांच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने अपघात कमी होण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात या मागणीसाठी जमावाने सुमारे अर्धातास महामार्ग रोखून धरला होता. घटनेचे वृत्त कळताच  तहसीलदार राजपूत, पोलीस उपअधीक्षक शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल कंपनी अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी  चर्चा करुन या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघात