शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन मित्रांनी एकापाठोपाठ घेतला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 18:54 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील उत्तम जाधव व बोपेगाव येथील शांताराम कावळे या दोन जिवलग वारकरी संप्रदायातील मित्रांचा एक दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने संपूर्ण दिंडोरी हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देदोघेही कीर्तनकार : दिंडोरी तालुक्यात हळहळ

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील उत्तम जाधव व बोपेगाव येथील शांताराम कावळे या दोन जिवलग वारकरी संप्रदायातील मित्रांचा एक दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने संपूर्ण दिंडोरी हळहळ व्यक्त केली जात आहे.दिंडोरी तालुक्यातील असा एकही कीर्तन सप्ताह नाही की त्या ठिकाणी उत्तम जाधव आणि शांताराम कावळे यांचे कीर्तन झाले नाही; मात्र याच दोन मित्रांचा एका दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला आहे. या दोन मित्रांनी आळंदी, देहू, पंढरपूर तसेच अनेक ठिकाणच्या अखंड हरिनाम सप्ताहात अन्नदान करण्याची भूमिका घेत आपला सहभाग नोंदविला आहे.

या दोघांची मैत्री लहानपणापासून होती. शांताराम कावळे हे कादवा सहकारी साखर कारखाना येथे शेतकी विभागात नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. काही दिवस त्यांनी तज्ज्ञ संचालक म्हणून काम पाहिले होते. तर उत्तम जाधव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वारकरी संप्रदायातील गायनाचार्य म्हणून परिचित होते. हे दोन्ही मित्र नेहमी एकत्र वारी, कुठेही सप्ताहाला एकत्रच असायचे. या जिवलग मित्रांच्या निधनाने दिंडोरी तालुक्यातील संपूर्ण वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू