शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

राज्य नाट्यस्पर्धेतील अंतिम फेरीत आता दोन नाटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 15:28 IST

नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिकमध्ये यंदा चांगल्या दर्जाची नाटके सादर झाल्यामुळे अंतिम फेरीत नाशिककर बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिकमध्ये यंदा चांगल्या दर्जाची नाटके सादर झाल्यामुळे अंतिम फेरीत नाशिककर बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महाराष्टÑ राज्य सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे घेतली जाणारी यंदाची ५७वी स्पर्धा होती. तिसाव्या राज्य नाट्यस्पर्धेपर्यंत जुन्या नियमांनुुसार स्पर्धा सुरळीत चालू होती. यानंतर अनेक नियम बदलल्याने कलावंतांचा हिरमोड झाला होता. केवळ नवीन संहिताच स्पर्धेत सादर केली जाईल असा नियम केल्यानंतर स्पर्धेत फक्त नवीनच नाटके सादर होऊ लागली. नवीन नाटकांचा सतत दुष्काळ जाणवत असल्याने अर्थातच स्पर्धेतील नाटकांची संख्या कमी झाली होती. त्याच वेळी प्रत्येक केंद्रातून एकच नाटक अंतिम फेरीत जाणार असा एक नियम तयार करण्यात आला होता. ज्या केंद्रावर वीस वीस नाटके सादर होत होती. त्या केंद्रांवरील नाटकांची संख्य पाचवर येऊन ठेपली होती. कारण नवीन नाटक मिळणे कठीण झाले होते. यापैकीच अंतिम फेरीत एकच नाटक जाणार हा नियमही कलावंतांना खटकत होता. मध्यंतरी यामुळेच स्पर्धेला मरगळ आली होती. एकच प्याला, नटसम्राट, विच्छा माझी पुरी करा या जुन्या दर्जेदार नाटकांना एकप्रकारे स्पर्धेतून बाद केले होते. यामुळे नाट्यस्पर्धा बंद पडण्याची वेळ आली होती. वारंवार मागणी करून पुन्हा जुनी नाटके स्पर्धेत सादर करण्याची मुभा मिळाली. आणि महाराष्टÑ शासनाच्या या स्पर्धेला उर्जितावस्था प्राप्त झाली. जुनी नाटके सादर करणे जरी पुन्हा सुरू झाले तरी अंतिम फेरीत एकच नाटक पाठविणे हा नियम तसाच ठेवण्यात आला होता. यंदा स्पर्धेच्या उदघाटनाच्या दिवशीच अभिनेता दीपक करंजीकर यांनी अंतिम फेरीत दोन नाटके जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षापासून हा नियम लागू होईल असेही त्यांनी सांगितले होते. परंतू हा नियम याच स्पर्धेपासून सुरू करण्यात आला. जुने नाटक सादर करणे आणि अंतिम फेरीत दोन नाटकांची निवड केली जाणे हा दुग्धशर्करा योग अखेर जुळून आला.