शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

राज्य नाट्यस्पर्धेतील अंतिम फेरीत आता दोन नाटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 15:28 IST

नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिकमध्ये यंदा चांगल्या दर्जाची नाटके सादर झाल्यामुळे अंतिम फेरीत नाशिककर बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिकमध्ये यंदा चांगल्या दर्जाची नाटके सादर झाल्यामुळे अंतिम फेरीत नाशिककर बाजी मारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महाराष्टÑ राज्य सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे घेतली जाणारी यंदाची ५७वी स्पर्धा होती. तिसाव्या राज्य नाट्यस्पर्धेपर्यंत जुन्या नियमांनुुसार स्पर्धा सुरळीत चालू होती. यानंतर अनेक नियम बदलल्याने कलावंतांचा हिरमोड झाला होता. केवळ नवीन संहिताच स्पर्धेत सादर केली जाईल असा नियम केल्यानंतर स्पर्धेत फक्त नवीनच नाटके सादर होऊ लागली. नवीन नाटकांचा सतत दुष्काळ जाणवत असल्याने अर्थातच स्पर्धेतील नाटकांची संख्या कमी झाली होती. त्याच वेळी प्रत्येक केंद्रातून एकच नाटक अंतिम फेरीत जाणार असा एक नियम तयार करण्यात आला होता. ज्या केंद्रावर वीस वीस नाटके सादर होत होती. त्या केंद्रांवरील नाटकांची संख्य पाचवर येऊन ठेपली होती. कारण नवीन नाटक मिळणे कठीण झाले होते. यापैकीच अंतिम फेरीत एकच नाटक जाणार हा नियमही कलावंतांना खटकत होता. मध्यंतरी यामुळेच स्पर्धेला मरगळ आली होती. एकच प्याला, नटसम्राट, विच्छा माझी पुरी करा या जुन्या दर्जेदार नाटकांना एकप्रकारे स्पर्धेतून बाद केले होते. यामुळे नाट्यस्पर्धा बंद पडण्याची वेळ आली होती. वारंवार मागणी करून पुन्हा जुनी नाटके स्पर्धेत सादर करण्याची मुभा मिळाली. आणि महाराष्टÑ शासनाच्या या स्पर्धेला उर्जितावस्था प्राप्त झाली. जुनी नाटके सादर करणे जरी पुन्हा सुरू झाले तरी अंतिम फेरीत एकच नाटक पाठविणे हा नियम तसाच ठेवण्यात आला होता. यंदा स्पर्धेच्या उदघाटनाच्या दिवशीच अभिनेता दीपक करंजीकर यांनी अंतिम फेरीत दोन नाटके जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षापासून हा नियम लागू होईल असेही त्यांनी सांगितले होते. परंतू हा नियम याच स्पर्धेपासून सुरू करण्यात आला. जुने नाटक सादर करणे आणि अंतिम फेरीत दोन नाटकांची निवड केली जाणे हा दुग्धशर्करा योग अखेर जुळून आला.