शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST

मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानक ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तापमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशांपर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तापमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळूहळू कमी होत चालली आहे. मंगळवारी (दि.२५) किमान तापमानाचा पारा १४.३ अंशांपर्यंत वर सरकला. एकूणच कमाल तापमानाचा पारादेखील २५ अंशांवरून पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तापमान तीस अंशांपर्यंत आले असून, किमान तापमानदेखील १४ अंशांपर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी शहरात दुपारपासून ढगाळ हवामान दाटल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थंडीची तीव्रता घटल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.सर्दी-पडशाचे रुग्ण घटणारनागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. सध्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदलले आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले होते.सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीण भागदेखील गारठला होता.४निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यामध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्षबागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण