शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST

मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानक ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तापमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशांपर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तापमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळूहळू कमी होत चालली आहे. मंगळवारी (दि.२५) किमान तापमानाचा पारा १४.३ अंशांपर्यंत वर सरकला. एकूणच कमाल तापमानाचा पारादेखील २५ अंशांवरून पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तापमान तीस अंशांपर्यंत आले असून, किमान तापमानदेखील १४ अंशांपर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी शहरात दुपारपासून ढगाळ हवामान दाटल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थंडीची तीव्रता घटल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.सर्दी-पडशाचे रुग्ण घटणारनागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. सध्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदलले आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले होते.सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीण भागदेखील गारठला होता.४निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यामध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्षबागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण