शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST

मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानक ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तापमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशांपर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तापमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळूहळू कमी होत चालली आहे. मंगळवारी (दि.२५) किमान तापमानाचा पारा १४.३ अंशांपर्यंत वर सरकला. एकूणच कमाल तापमानाचा पारादेखील २५ अंशांवरून पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तापमान तीस अंशांपर्यंत आले असून, किमान तापमानदेखील १४ अंशांपर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी शहरात दुपारपासून ढगाळ हवामान दाटल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थंडीची तीव्रता घटल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.सर्दी-पडशाचे रुग्ण घटणारनागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. सध्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदलले आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले होते.सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीण भागदेखील गारठला होता.४निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यामध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्षबागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण