शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

दोन कोटी रोपांची होणार लागवड

By admin | Updated: June 14, 2016 23:57 IST

वनविभाग : १ जुलै रोजीच्या कार्यक्र मासाठी कळवण तालुका सज्ज

कळवण : बिघडलेल्या पर्यावरणाचा दुष्परिणाम लक्षात घेऊन संपूर्ण राज्यभरात १ जुलै रोजी राज्य शासनाच्या वनविभागाकडून दोन कोटी वृक्षलागवडीसाठीचा संकल्प करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. कळवण व कनाशी वनपरिक्षेत्र कार्यकक्षेत नियोजन करण्यात आले असून, वृक्षलागवडीसाठी कळवण तालुक्यातील वनविभाग सज्ज असल्याची माहिती कनाशी वनपरिक्षेत्र विभागाचे वनाधिकारी अमोल आढे यांनी दिली.वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त लोकसहभाग कसा वाढेल यासाठी शासन यंत्रणा व विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. याबाबत राज्याचे वित्त आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व वनविभागाच्या यंत्रणेला सूचना करून लोकसहभागातून जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले आहे.वनविभागातील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसाची माहिती किती झाडे लावण्यात आली त्याची संख्या मिळविण्यासाठी मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक वनरक्षकाला आपल्या झाडांची संख्या नोंदवता येणार आहे. त्यांचे मोबाइल नंबर नोंदणी म्हणून टाकण्यात आले आहेत, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. वेळेत वृक्ष लागवड करण्यासाठी विशेष बक्षिसे वनविभागामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती कनाशीचे वनअधिकारी अमोल आढे व कळवणचे वनरक्षक अनिल गुंजाळ यांनी दिली.वनलागवड कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसिकता, वैचारिक बदलांची आवश्यकता असून, या उपक्रमात कळवण तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार व स्वयंसेवी संस्थांनी व नागरिकांनीदेखील सहभाग नोंदवावा, असे आवाहन कनाशी वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एन. आडे, वनपाल वैभव हिरे यांनी केले. (वार्ताहर)