शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

अडीच लाख शेतकऱ्यांना लाभले पीकविम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:26 IST

मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ ...

ठळक मुद्देशासनाची ऐच्छिक योजना : कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश

मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ हजार ६१० शेतकºयांनी खरीप हंगामातील पिकांना विम्याचे कचव घेतले आहे. २ आॅगस्टअखेर जिल्ह्यात दोन लाख ५७ हजार ४६८ शेतकºयांनी पीकविमा, तर ११ हजार १४२ शेतकºयांनी फळ पीकविमा काढून घेतला आहे.जिल्ह्यातील एक लाख ६६ हजार ११४.५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे. शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना तसेच हवामान आधारित फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकºयांनी सहभाग घ्यावा यासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला होता. ही योजना ऐच्छिक आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी व लावणी न होणे, प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान म्हणजेच काढणीच्या १५ दिवस आधी पावसाने मारलेली दडी, दुष्काळ, पूरस्थिती यामुळे अपेक्षित सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के घट असेल तर तसेच पीक पेरणी काढणीपर्यंतच्या पिकांच्या उत्पादनात कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव व नैसर्गिक आपत्ती, भूकंप, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, पीक काढणीनंतर चौदा दिवसाच्या आत शेती उत्पादनाचे नुकसान झाले तर विमा घेतलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी शासनाने प्रतिहेक्टरसाठी पीकनिहाय विम्याचे दर निश्चित केले होते. यात कापूस २ हजार २५० रुपये, मका ६०० रुपये, कांदा ३ हजार २५० रुपये, ज्वारी ९०० रुपये, बाजरी ४४० रुपये, सोयाबीन ९०० रुपये, भुईमूग ७०० रुपये, मूग - उडीद ४०० रुपये, तूर ७०० रुपये असे आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी