शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

अडीच लाख शेतकऱ्यांना लाभले पीकविम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:26 IST

मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ ...

ठळक मुद्देशासनाची ऐच्छिक योजना : कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश

मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ हजार ६१० शेतकºयांनी खरीप हंगामातील पिकांना विम्याचे कचव घेतले आहे. २ आॅगस्टअखेर जिल्ह्यात दोन लाख ५७ हजार ४६८ शेतकºयांनी पीकविमा, तर ११ हजार १४२ शेतकºयांनी फळ पीकविमा काढून घेतला आहे.जिल्ह्यातील एक लाख ६६ हजार ११४.५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे. शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना तसेच हवामान आधारित फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकºयांनी सहभाग घ्यावा यासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला होता. ही योजना ऐच्छिक आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी व लावणी न होणे, प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान म्हणजेच काढणीच्या १५ दिवस आधी पावसाने मारलेली दडी, दुष्काळ, पूरस्थिती यामुळे अपेक्षित सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के घट असेल तर तसेच पीक पेरणी काढणीपर्यंतच्या पिकांच्या उत्पादनात कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव व नैसर्गिक आपत्ती, भूकंप, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, पीक काढणीनंतर चौदा दिवसाच्या आत शेती उत्पादनाचे नुकसान झाले तर विमा घेतलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी शासनाने प्रतिहेक्टरसाठी पीकनिहाय विम्याचे दर निश्चित केले होते. यात कापूस २ हजार २५० रुपये, मका ६०० रुपये, कांदा ३ हजार २५० रुपये, ज्वारी ९०० रुपये, बाजरी ४४० रुपये, सोयाबीन ९०० रुपये, भुईमूग ७०० रुपये, मूग - उडीद ४०० रुपये, तूर ७०० रुपये असे आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी