शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

अडीच लाख शेतकऱ्यांना लाभले पीकविम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:26 IST

मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ ...

ठळक मुद्देशासनाची ऐच्छिक योजना : कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश

मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ हजार ६१० शेतकºयांनी खरीप हंगामातील पिकांना विम्याचे कचव घेतले आहे. २ आॅगस्टअखेर जिल्ह्यात दोन लाख ५७ हजार ४६८ शेतकºयांनी पीकविमा, तर ११ हजार १४२ शेतकºयांनी फळ पीकविमा काढून घेतला आहे.जिल्ह्यातील एक लाख ६६ हजार ११४.५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे. शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना तसेच हवामान आधारित फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकºयांनी सहभाग घ्यावा यासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला होता. ही योजना ऐच्छिक आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी व लावणी न होणे, प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान म्हणजेच काढणीच्या १५ दिवस आधी पावसाने मारलेली दडी, दुष्काळ, पूरस्थिती यामुळे अपेक्षित सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के घट असेल तर तसेच पीक पेरणी काढणीपर्यंतच्या पिकांच्या उत्पादनात कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव व नैसर्गिक आपत्ती, भूकंप, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, पीक काढणीनंतर चौदा दिवसाच्या आत शेती उत्पादनाचे नुकसान झाले तर विमा घेतलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी शासनाने प्रतिहेक्टरसाठी पीकनिहाय विम्याचे दर निश्चित केले होते. यात कापूस २ हजार २५० रुपये, मका ६०० रुपये, कांदा ३ हजार २५० रुपये, ज्वारी ९०० रुपये, बाजरी ४४० रुपये, सोयाबीन ९०० रुपये, भुईमूग ७०० रुपये, मूग - उडीद ४०० रुपये, तूर ७०० रुपये असे आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी