शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पाथरे येथे दोन एकर ऊस खाक

By admin | Updated: May 8, 2016 00:19 IST

पाथरे येथे दोन एकर ऊस खाक

 पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे वीजवाहिनीमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे दोन एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.पाथरे खुर्द शिवारातील गट नंबर ३१४ मध्ये जयश्री रवींद्र चोपडे यांच्या मालकीच्या दोन एकर शेतात उसाचे पीक आहे. याच शेतातून वीजवाहक तारा गेल्या आहेत. खांब वाकलेले असून, विजेच्या ताराही लोंबकळलेल्या आहेत. लोंबकळलेल्या तारांचे वाऱ्यामुळे घर्षण होऊन उडालेल्या ठिणग्या उसावर पडल्याने चिपाडाने पेट घेतल्याचे चोपडे यांनी सांगितले. वाऱ्यामुळे उसाचे पीक भराभरा पेटत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरी नानासाहेब गुंजाळ, संगीता गुंजाळ, मोहन चिने यांनी घटनास्थळी धाव घेत चोपडे यांनाही भ्रमणध्वनीहून आगीची माहिती दिली. पूर्ण वाढलेल्या उसाने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळांनी आग विझविण्यास अपयश आले आणि काही वेळातच शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर सुमारे शंभर टन ऊस जळून खाक झाला.चोपडे यांच्याकडे बारा गायी आहेत. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या चाराटंचाईचा सामना करण्यासाठी चोपडे यांनी ऊस कारखान्याला न देता जनावरांना चारा म्हणून ठेवला होता. याशिवाय परिसरातील काही शेतकऱ्यांनाही याच शेतातून ते चारा देत होते. आगीमुळे चोपडे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.याशिवाय दूध व्यवसायावरही चाराटंचाईचा विपरीत परिणाम होणार आहे. तलाठी के. एम. परदेशी व वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता एल. एल. मांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. परिसरातील अनेक शेतांमध्ये वाकलेले विजेचे खांब व लोंबकळलेल्या तारांच्या समस्या आहेत. वीज वितरण कंपनीने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)