शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

आदिवासी विकासचे अडीचशे कोटी रुपये पडून

By admin | Updated: September 22, 2016 01:11 IST

योजनांना ग्रहण : विकासकामे अडली

नाशिक : सध्या मोखाडा येथील कुपोषणामुळे चर्चेत आलेल्या आदिवासी विभागाचे अधिकारी विविध योजनांचा निधी खर्च करण्याबाबत अत्यंत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. वित्त विभागाने चार महिन्यांपूर्वी दिलेला सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून असून त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांच्या हेतुविषयीच शंका घेतली जात आहे.राज्यातील आदिवासी बांधवांना विविध मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी राज्याच्या एकूण अंदाजपत्रकाचा नऊ टक्के निधी आदिवासी विभागाला दिला जातो. यात आदिवासींना व्यक्तिगत लाभाच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर मूलभूत सुविधा आणि आदिवासींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारची कामे केली जातात. परंतु योजना आणि पायाभूत कामे या दोन्ही विषयांबाबत अधिकारी उदासीन असल्यानेच तरतूद करूनही रक्कम अखर्चित राहते. त्याचा अनुभव यंदाच्या वर्षीही येत आहे. राज्य सरकारचे अंदाजपत्रक संमत झाल्यानंतर १६ मे रोजी २३९ कोटी रुपये वित्त विभागाने आदिवासी विकास विभागाकडे वर्ग केले आहेत. परंतु त्याचाही विनियोग चार महिन्यांत न झाल्याने कोट्यवधी रुपयांची ही रक्कम वापराविना पडून आहे. त्यामुळे अनेक कामेही अर्धवट स्थितीत आहेत. आदिवासींना दळणवळणाची साधनेच उपलब्ध झाली नाही तर ते मूळ प्रवाहात कसे येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाचा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याची चर्चा होत आहे. गेल्या वर्षीही कामे अडवून ठेवणे आणि नंतर त्यांचा पुन्हा समावेश करण्यामागे अशाच प्रकारची कारणे असल्याचे सांगितले जात होते. आता पुन्हा हेच कारण आहे काय याचा शोध आदिवासी विकास मंत्र्यांनी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)आदिवासी विभागाकडे मुबलक निधी असतानादेखील तो खर्च करण्याची अधिकाऱ्यांची मानसिकताच नसते. परिणामी आदिवासी भागात कल्याणकारी योजनाच राबवता येत नाही. आदिवासी क्षेत्रातील कुपोषण तसेच अन्य योजना राबविण्यासाठी मुळात काम करण्याची मानसिकता असेल तर अनेक प्रश्न सुटू शकतात.- आमदार निर्मला गावित,इगतपुरी- त्र्यंबक विधानसभा मतदार संघ