शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

आदिवासी विकासचे अडीचशे कोटी रुपये पडून

By admin | Updated: September 22, 2016 01:11 IST

योजनांना ग्रहण : विकासकामे अडली

नाशिक : सध्या मोखाडा येथील कुपोषणामुळे चर्चेत आलेल्या आदिवासी विभागाचे अधिकारी विविध योजनांचा निधी खर्च करण्याबाबत अत्यंत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. वित्त विभागाने चार महिन्यांपूर्वी दिलेला सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून असून त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांच्या हेतुविषयीच शंका घेतली जात आहे.राज्यातील आदिवासी बांधवांना विविध मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी राज्याच्या एकूण अंदाजपत्रकाचा नऊ टक्के निधी आदिवासी विभागाला दिला जातो. यात आदिवासींना व्यक्तिगत लाभाच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर मूलभूत सुविधा आणि आदिवासींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारची कामे केली जातात. परंतु योजना आणि पायाभूत कामे या दोन्ही विषयांबाबत अधिकारी उदासीन असल्यानेच तरतूद करूनही रक्कम अखर्चित राहते. त्याचा अनुभव यंदाच्या वर्षीही येत आहे. राज्य सरकारचे अंदाजपत्रक संमत झाल्यानंतर १६ मे रोजी २३९ कोटी रुपये वित्त विभागाने आदिवासी विकास विभागाकडे वर्ग केले आहेत. परंतु त्याचाही विनियोग चार महिन्यांत न झाल्याने कोट्यवधी रुपयांची ही रक्कम वापराविना पडून आहे. त्यामुळे अनेक कामेही अर्धवट स्थितीत आहेत. आदिवासींना दळणवळणाची साधनेच उपलब्ध झाली नाही तर ते मूळ प्रवाहात कसे येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाचा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याची चर्चा होत आहे. गेल्या वर्षीही कामे अडवून ठेवणे आणि नंतर त्यांचा पुन्हा समावेश करण्यामागे अशाच प्रकारची कारणे असल्याचे सांगितले जात होते. आता पुन्हा हेच कारण आहे काय याचा शोध आदिवासी विकास मंत्र्यांनी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)आदिवासी विभागाकडे मुबलक निधी असतानादेखील तो खर्च करण्याची अधिकाऱ्यांची मानसिकताच नसते. परिणामी आदिवासी भागात कल्याणकारी योजनाच राबवता येत नाही. आदिवासी क्षेत्रातील कुपोषण तसेच अन्य योजना राबविण्यासाठी मुळात काम करण्याची मानसिकता असेल तर अनेक प्रश्न सुटू शकतात.- आमदार निर्मला गावित,इगतपुरी- त्र्यंबक विधानसभा मतदार संघ