शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनचे घसरले सव्वीस डबे

By admin | Updated: December 31, 2016 22:50 IST

वाताहत : विकासाची राजमात्रा ठरली कुचकामी; सत्तापद कायम राखण्याचे आव्हान

धनंजय वाखारे : नाशिकमहापालिका निवडणुकीत सर्वाधिक चाळीस नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंचवार्षिक काळात आधी भाजपाच्या नंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कुबड्या घेऊन कसाबसा संसार केला. कधी प्रशासकीय तर कधी राजकीय कारणांमुळे राज ठाकरे यांनी दाखविलेल्या विकासाची मात्रा काही चालली नाही आणि रुळावर प्रथमच चढलेल्या इंजिनचे तब्बल सव्वीस डबे घसरले. सत्ताधारी असूनही पक्षाची वाताहत होण्याचे दुर्भाग्य मनसेच्या वाट्याला आले.सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत फार्मात असलेल्या मनसेच्या राज करिश्म्यावर चाळीस जण स्वार होत निवडून आले आणि सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या मनसेने भाजपाच्या साथीने सत्तापद हस्तगत केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. मनसेचे पहिले महापौर म्हणून अ‍ॅड. यतिन वाघ यांना बहुमान प्राप्त झाला, तर उपमहापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी यांची वर्णी लागली. मात्र, महत्त्वाची अर्थवाहिनी मानली जाणारी स्थायी समिती कॉँग्रेसचे उद्धव निमसे यांच्या हाती गेल्याने मनसे-भाजपाची कोंडी झाली. कधी पूर्णवेळ आयुक्तच नाही तर कधी शासनाकडून वेगवेगळ्या प्रकल्पांना मिळणाऱ्या स्थगित्या यामुळे कामकाज करणे अवघड होऊन बसल्याची कबुली खुद्द राज यांना द्यावी लागली आणि इच्छा असूनही विकासाची वाट धरता येत नसल्याचे सांगत शासनावर खापर फोडत राहिले. मित्र पक्ष भाजपातही कामे होत नसल्याने असंतोष पसरला आणि भाजपा मनसेपासून अलग झाला. पुढच्या अडीच वर्षांत दुसऱ्यांदा महापौर निवडीची वेळ येऊन ठेपली त्यावेळी राजकीय समीकरणे बदलली.