शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत बारा व्यक्तींचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:38 IST

नाशिक : जून महिन्यात मान्सूनपूर्व व त्यानंतर विजेचा कडकडाट, वादळी वाºयामुळे धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात बारा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ६९ जनावरेही दगावली आहेत. वादळी वाºयामुळे ३७३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नाशिक : जून महिन्यात मान्सूनपूर्व व त्यानंतर विजेचा कडकडाट, वादळी वाºयामुळे धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात बारा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ६९ जनावरेही दगावली आहेत. वादळी वाºयामुळे ३७३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था झाली असली तरी, या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानीलाही सामोरे जावे लागले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने विजेचा कडकडाट करत जोरदार हजेरी लावल्याने त्यात वीज पडून जिल्ह्णात दहा जणांचा बळी गेला. एकट्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन तर सिन्नर व मालेगावी प्रत्येकी दोन व्यक्ती त्यात दगावल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरड कोसळून एक व्यक्ती मरण पावली असून, नाशिक शहरात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात पंचवटीतील मोरे मळा येथे राहणारी व्यक्ती मरण पावल्याने नैसर्गिक आपत्तीत एकूण बारा व्यक्ती दगावल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना अथवा वारसांना चार लाख रुपयांप्रमाणे मदत देण्याची तरतूद असल्याने दगावलेल्या बारापैकी अकरा व्यक्तींना ४४ लाख रुपयांचे शासकीय आर्थिक अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. जून व जुलै या दोन महिन्यात विविध कारणांनी जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या आहेत. एकूण ६९ जनावरे वीज पडून पुरात वाहून गेली असून, त्यात दुभती तसेच ओढकाम करणाºया जनावरांचा समावेश आहे. मोठी दुधाळ ३० जनावरे, ६ लहान दुधाळ म्हणजेच शेळ्या, मेंढ्यांचाही त्यात समावेश आहे. लहान-मोठी ओढकाम करणारे बैल, रेडे असे ३३ जनावरांचाही या काळात मृत्यू ओढवला आहे. जनावरांच्या मालकांना एक कोटी ६५ लाख आठ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती कायद्यान्वये नुकसानभरपाईच्या रकमेत दोन वर्षांपूर्वी वाढ केल्याने प्रत्येक जनावराच्या उपयोगीतेवर आर्थिक मदत देण्याची तरतूद या कायद्यात आहे. सुरगाण्यात सर्वाधिक पडझडपावसाळ्यातील वादळी वाºयाने मोठ्या प्रमाणावर घरे, शाळा, गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यात सर्वाधिक ११६ घरांची पडझड सुरगाणा तालुक्यात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पक्क्या, ३७३ घरांची अंशत व सात झोपड्या, सहा गोठ्यांची पडझड झाली असून, त्यापैकी फक्त १८२ घरांना नुकसान भरपाईपोटी ५२ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.