शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

दोन महिन्यांत बारा व्यक्तींचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:38 IST

नाशिक : जून महिन्यात मान्सूनपूर्व व त्यानंतर विजेचा कडकडाट, वादळी वाºयामुळे धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात बारा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ६९ जनावरेही दगावली आहेत. वादळी वाºयामुळे ३७३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नाशिक : जून महिन्यात मान्सूनपूर्व व त्यानंतर विजेचा कडकडाट, वादळी वाºयामुळे धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात बारा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ६९ जनावरेही दगावली आहेत. वादळी वाºयामुळे ३७३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था झाली असली तरी, या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानीलाही सामोरे जावे लागले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने विजेचा कडकडाट करत जोरदार हजेरी लावल्याने त्यात वीज पडून जिल्ह्णात दहा जणांचा बळी गेला. एकट्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन तर सिन्नर व मालेगावी प्रत्येकी दोन व्यक्ती त्यात दगावल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरड कोसळून एक व्यक्ती मरण पावली असून, नाशिक शहरात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात पंचवटीतील मोरे मळा येथे राहणारी व्यक्ती मरण पावल्याने नैसर्गिक आपत्तीत एकूण बारा व्यक्ती दगावल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना अथवा वारसांना चार लाख रुपयांप्रमाणे मदत देण्याची तरतूद असल्याने दगावलेल्या बारापैकी अकरा व्यक्तींना ४४ लाख रुपयांचे शासकीय आर्थिक अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. जून व जुलै या दोन महिन्यात विविध कारणांनी जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या आहेत. एकूण ६९ जनावरे वीज पडून पुरात वाहून गेली असून, त्यात दुभती तसेच ओढकाम करणाºया जनावरांचा समावेश आहे. मोठी दुधाळ ३० जनावरे, ६ लहान दुधाळ म्हणजेच शेळ्या, मेंढ्यांचाही त्यात समावेश आहे. लहान-मोठी ओढकाम करणारे बैल, रेडे असे ३३ जनावरांचाही या काळात मृत्यू ओढवला आहे. जनावरांच्या मालकांना एक कोटी ६५ लाख आठ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती कायद्यान्वये नुकसानभरपाईच्या रकमेत दोन वर्षांपूर्वी वाढ केल्याने प्रत्येक जनावराच्या उपयोगीतेवर आर्थिक मदत देण्याची तरतूद या कायद्यात आहे. सुरगाण्यात सर्वाधिक पडझडपावसाळ्यातील वादळी वाºयाने मोठ्या प्रमाणावर घरे, शाळा, गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यात सर्वाधिक ११६ घरांची पडझड सुरगाणा तालुक्यात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पक्क्या, ३७३ घरांची अंशत व सात झोपड्या, सहा गोठ्यांची पडझड झाली असून, त्यापैकी फक्त १८२ घरांना नुकसान भरपाईपोटी ५२ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.