शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कांदा उत्पादक अडचणीत

By admin | Updated: July 23, 2016 00:37 IST

लासलगाव : पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील लिलाव बंद

लासलगाव : जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी आपले परवाने परत केले असले तरी, संचालक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र परवाने जमा न करता आंदोलनाचा फार्स केला की काय याची चर्चा सुरू आहे. नवीन व्यापारीवर्गाच्या वतीने लासलगाव बाजार समितीत परवाने घेण्याबाबत चौकशी वाढली आहे. पुणे, मुंबई, धुळे, अहमदनगर तसेच नवी मुंबई येथील मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी परवाने घेणेबाबत चौकशी केली आहे. व्यापारी संघटनेचे बहुतांशी नेते बाजार समितीच्या संचालक मंडळावर आहेत. इतर व्यापारीवर्गाने परवाने परत केले; परंतु दुटप्पीपणा ठेवीत संचालक पद रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन या नेत्यांनी परवाने परतच केलेले नाहीत, अशी खात्रीलायक माहिती आहे.लिलाव बंदने केवळ शेतकरी व व्यापारी नव्हे तर हमाल, मापारी, ट्रकमालक, चालक, व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत.राज्य सरकारने सक्षम पर्याय निर्माण करूनच असे निर्णय घेतले पाहिजेत, असे शेतकरी बोलताना दिसून आले.सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांद्याची चांगली आवक असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणेंसाठी शेतकरी कांदा विक्रीसाठी उत्सुक आहेत. त्यातही जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू असल्याने पावसाची आर्द्रता लागून कांद्यांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. अशावेळी बहुतांशी शेतकर्?यांना कांदा साठवून ठेवणे अडचणीचे ठरत आहे. नेमकी हीच परिस्थिती अधिक तीव्र करून शेतकर्?यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी करण्याचा व्यापार्?यांचा डाव असल्याची शंका शेतकरी, जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मुळात राज्यभरातील व्यापार्?यांनी ज्या मागण्यांसाठी बंद केला होता त्याबाबत शासन स्तरावर चर्चा होऊन बंद मागे घेण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील व्यापार्?यांनी बंद सुरूच ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.