शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

रस्ता दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST

नाशिक : पुणे-नाशिक हायवे व नाशिक-मुंबई हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली ...

नाशिक : पुणे-नाशिक हायवे व नाशिक-मुंबई हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा तक्रार करूनही वाहतूकदारांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा? असा प्रश्न उपस्थित करीत जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही, तोपर्यंत टोल बंद करा, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली असून शिंदे व घोटी टोल नाका येथील असुविधांविषयीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही तक्रार करण्यात आत्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.

नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे व नाशिक-मुंबई हायवेवरील घोटी टोल नाक्यावर वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टोलच्या ठिकाणी असलेली फास्टॅगची सुविधा अतिशय संथ व निष्क्रिय असून याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. टोल ओलांडून जातानाच अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. टोल परिसरात क्रेन, रुग्णवाहिका, यू-टर्नला बत्ती, रोडच्या कडेला सफेद पट्टा, स्वच्छतागृहांची स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असून याविषयी वारंवार तक्रारी देऊनही सुधारणा होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे सोयी-सुविधा नसलेल्या रस्त्यावर टोल का भरावा? असा प्रश्न वाहतूकदारांपुढे निर्माण झालेला असताना दुसरीकडे टोलचा दर मात्र वाढतच असून ही एक प्रकारची वसुलीच असल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे.

सदोष फास्टॅगच्या यंत्रणेमुळे माल वाहतूकदारांना स्कॅन न झाल्यास वाहने पुन्हा मागे घ्यावी लागतात. अशा वेळी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. यासंदर्भात टोल नाक्यावर निवेदन देण्यास गेलो असताना प्रत्यक्ष असा प्रकार बघायला मिळाला. यावेळी वाहन मागे घेत असताना अपघात होऊन दोन गाड्यांचे नुकसान झाले. याचा फटकादेखील वाहतूकदारांना बसत असल्याने यंत्रणा सुधारण्याची वाहतूकदारांची मागणी आहे.

- राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन.