शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

माथाडींच्या संपाने धान्य उचल बंद

By admin | Updated: February 25, 2015 00:39 IST

माथाडींच्या संपाने धान्य उचल बंद

  नाशिक : माथाडी कामगारांनी सोमवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका पुरवठा विभागाला बसला असून, दोन दिवसांपासून धान्याची उचल ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक वितरण प्रणालीवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, त्याला यश मिळालेले नाही. शासकीय धान्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराशी नवीन करार करावा, माथाडी महामंडळाने ठरवून दिलेल्या दरानुसार हमाली द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्य माथाडी कामगार जनरल युनियनने बेमुदत संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले आहे. अन्नधान्य महामंडळातून वाहतूक केले जाणारे व शासकीय गुदामात धान्य उतरविणारे शेकडो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून धान्याची उचल पूर्णत: बंद झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुढच्या महिन्याचे धान्य आदल्या महिन्यातच अन्नधान्य महामंडळाकडून उचलण्याचे बंधनकारक करण्यात आलेले असून, साधारणत: महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ही कार्यवाही केली जाते. त्यामुळे या संपामुळे धान्य उचलणे बंद झाले आहे. दरम्यान, वाहतूक ठेकेदाराशी नव्याने करार करण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाकडून सुरू असून, माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न केले जात होते.