शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

घोरवड घाटातील वळण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:43 IST

विंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

ठळक मुद्देसिन्नर-घोटी मार्ग : संरक्षक कठड्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविंचुरी दळवी : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटातील वळण धोकादायक ठरत असून, या वळणावर संरक्षण कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.संरक्षक कठडे व दिशादर्शक फलक नसल्यामुळे घोरवड घाटातील वळण धोकादायक बनले आहे. वाहनधारकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिन्नरकडून घोटीकडे येण्यासाठी उतार असल्याने वाहनांना वेग अधिक असतो, तर घोटीकडून सिन्नरकडे जाणारी वाहने चढ असल्याने हळू असतात. सिन्नरकडून येणारी वाहने वळणावर संरक्षक कठडे नसल्याने सरळ दरीत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या वळणावर अपघात होऊन चार-पाच जणांना जीव गमवावा लागला होता. वळणाचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने घाटाच्या खाली गेली आहेत. मुंबईकडील साईभक्तसुद्धा याच मार्गाचा अवलंब करतात.त्यांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन घाटातील अपघाती वळणावर संरक्षक कठडे व दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे.वाहनांची मोठी वर्दळसिन्नर-घोटी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. घोटी व सिन्नरला मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील शेतकरी आपला माल बाजारपेठेत विक्रीला नेण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मुंबई येथून येणारे साईभक्त याच मार्गाने शिर्डीला जातात. हा मार्ग सर्वांच्या सोयीचा आहे. मात्र, घोरवड घाटातील वळण सर्वांना धोकादायक ठरत आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडी