शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उमेदवारांच्या पक्षांतराने वाजले निवडणुकीचे बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:20 IST

गेली पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे एकहाती सत्ता असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने येत्या दोन महिन्यात होणाºया आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहराचे राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे.

घोटी : गेली पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे एकहाती सत्ता असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने येत्या दोन महिन्यात होणाºया आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहराचे राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे. शहरातील मतदारात आपल्या पक्षाची प्रतिमा आचारसंहितेपूर्वी निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष विविध क्लृप्त्या लढवत असून, यात सत्ताधारी शिवसेनेबरोबर भाजपानेही आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण जगात ओळख असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपत येत असल्याने, येत्या दोन महिन्यात या नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी वातावरण निर्मिती व राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. गेली पंचवीस वर्षांपासून अखंडपणे एकहाती सत्ता असणाºया शिवसेनेने ही नगरपालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असून, नगराध्यक्ष पदापासून अठरा नगरसेवकासाठी इच्छुक उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे तर याबाबत केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपानेही या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पार पडल्या आहेत तर मागील निवडणुकीत एकही जागा न मिळविणाºया काँग्रेस पक्षावर ऐनवेळी उमेदवार शोधण्याची केवलवाणी वेळ येणार आहे तर प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मातब्बर पदाधिकारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षात गेल्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे दिसून येते. या निवडणुकीपूर्वी सत्तांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. यात राष्ट्रवादीचे फिरोज पठाण यांनी राष्ट्रवादीचा त्याग करीत भाजपामध्ये प्रवेश केला. ते नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात तर राष्ट्रवादीचे यशवंत दळवी यांनीही भाजपात प्रवेश करून प्रवाहाबरोबर जाणे पसंत केले तर काँग्रेसचे व आमदार निर्मला गावित यांचे खंदे समर्थक समजले जाणारे किरण फलटणकर हेही भाजपाच्या डेºयात सहभागी झाले. यामुळे भाजपाची शहरातील ताकद वाढल्याचे बोलले जाते. दरम्यान शहरातील निर्णायक मतदार म्हणून समजल्या जाणाºया दलित समाजात या निवडणुकीत दुहीचे राजकारण पाहण्यास मिळणार आहे. केंद्रात आणि राज्यात रिपाइं भाजपाबरोबर असताना मात्र शहरातील रिपाइंचा एक गट शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे समजते. यामुळे दलित मतांचा फायदा नेमका कोणाला? हे मात्र गुलदस्त्यात आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेकडून नगरसेवक झालेल्या रिपाइंचे सुनील रोकडे आणि शशिकांत उबाळे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी शिवसेनेने देऊ केली होती. त्याची कृतज्ञता म्हणून रिपाइंचा एक गट सेनेला साथ देणार आहे. एकंदरीत या निवडणुकीत तोडफोडीचे राजकारण करा ही रणनीती सर्वच राजकीय पक्ष आखणार आहे. प्रथमच नगराध्यक्षपदाची निवड थेट होत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार हे मात्र निश्चित. या निवडणुकीत भावली धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याचे श्रेय गाजणार आहे. भाजपाने आपल्यामुळे हा प्रश्न सुटला असा जाहीर गवगवा गेला असून, सत्ताधारी शिवसेना मात्र हा प्रश्न आम्हीच पाठपुरावा केल्याने मार्गी लावला, असे जाहीर करीत आहे. यामुळे न झालेल्यापाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रकार निवडणुकीआधी सुरू झाला आहे.