शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

उमेदवारांच्या पक्षांतराने वाजले निवडणुकीचे बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:20 IST

गेली पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे एकहाती सत्ता असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने येत्या दोन महिन्यात होणाºया आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहराचे राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे.

घोटी : गेली पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे एकहाती सत्ता असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने येत्या दोन महिन्यात होणाºया आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहराचे राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे. शहरातील मतदारात आपल्या पक्षाची प्रतिमा आचारसंहितेपूर्वी निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष विविध क्लृप्त्या लढवत असून, यात सत्ताधारी शिवसेनेबरोबर भाजपानेही आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण जगात ओळख असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपत येत असल्याने, येत्या दोन महिन्यात या नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी वातावरण निर्मिती व राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. गेली पंचवीस वर्षांपासून अखंडपणे एकहाती सत्ता असणाºया शिवसेनेने ही नगरपालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असून, नगराध्यक्ष पदापासून अठरा नगरसेवकासाठी इच्छुक उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे तर याबाबत केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपानेही या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पार पडल्या आहेत तर मागील निवडणुकीत एकही जागा न मिळविणाºया काँग्रेस पक्षावर ऐनवेळी उमेदवार शोधण्याची केवलवाणी वेळ येणार आहे तर प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मातब्बर पदाधिकारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षात गेल्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे दिसून येते. या निवडणुकीपूर्वी सत्तांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. यात राष्ट्रवादीचे फिरोज पठाण यांनी राष्ट्रवादीचा त्याग करीत भाजपामध्ये प्रवेश केला. ते नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात तर राष्ट्रवादीचे यशवंत दळवी यांनीही भाजपात प्रवेश करून प्रवाहाबरोबर जाणे पसंत केले तर काँग्रेसचे व आमदार निर्मला गावित यांचे खंदे समर्थक समजले जाणारे किरण फलटणकर हेही भाजपाच्या डेºयात सहभागी झाले. यामुळे भाजपाची शहरातील ताकद वाढल्याचे बोलले जाते. दरम्यान शहरातील निर्णायक मतदार म्हणून समजल्या जाणाºया दलित समाजात या निवडणुकीत दुहीचे राजकारण पाहण्यास मिळणार आहे. केंद्रात आणि राज्यात रिपाइं भाजपाबरोबर असताना मात्र शहरातील रिपाइंचा एक गट शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे समजते. यामुळे दलित मतांचा फायदा नेमका कोणाला? हे मात्र गुलदस्त्यात आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेकडून नगरसेवक झालेल्या रिपाइंचे सुनील रोकडे आणि शशिकांत उबाळे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी शिवसेनेने देऊ केली होती. त्याची कृतज्ञता म्हणून रिपाइंचा एक गट सेनेला साथ देणार आहे. एकंदरीत या निवडणुकीत तोडफोडीचे राजकारण करा ही रणनीती सर्वच राजकीय पक्ष आखणार आहे. प्रथमच नगराध्यक्षपदाची निवड थेट होत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार हे मात्र निश्चित. या निवडणुकीत भावली धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याचे श्रेय गाजणार आहे. भाजपाने आपल्यामुळे हा प्रश्न सुटला असा जाहीर गवगवा गेला असून, सत्ताधारी शिवसेना मात्र हा प्रश्न आम्हीच पाठपुरावा केल्याने मार्गी लावला, असे जाहीर करीत आहे. यामुळे न झालेल्यापाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रकार निवडणुकीआधी सुरू झाला आहे.