शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

संप मोडून काढण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:45 IST

आपत्ती कायद्याचा घेणार आधार : खासगी वाहनांची सेवा; शासनाचे आदेश नाशिक : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे होत असलेले हाल लक्षात घेता सरकारने हा संप मोडून काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेण्याचा निर्णय घेतला असून, आपत्परिस्थितीत जिल्हाधिकाºयांनी या कायद्याचा वापर करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील एस.टी.चे सर्वाधिक आॅपरेशन असलेल्या मार्गाची माहिती गोळा करण्यात येत असून, प्रसंगी खासगी वाहने ताब्यात घेऊन त्याआधारे प्रवासी वाहतूक करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात मंगळवारी रात्रीच सर्व जिल्हाधिकाºयांना आदेश दिले आहेत. एस.टी. कर्मचाºयांचा संप हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यात मोडत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी खासगी वाहने अधिग्रहीत करणे, कार, जीप, टॅक्सी तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसेस, ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस, मालवाहतूक वाहने ताब्यात घेऊन त्याच्या आधारे प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

आपत्ती कायद्याचा घेणार आधार : खासगी वाहनांची सेवा; शासनाचे आदेश

नाशिक : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे होत असलेले हाल लक्षात घेता सरकारने हा संप मोडून काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेण्याचा निर्णय घेतला असून, आपत्परिस्थितीत जिल्हाधिकाºयांनी या कायद्याचा वापर करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील एस.टी.चे सर्वाधिक आॅपरेशन असलेल्या मार्गाची माहिती गोळा करण्यात येत असून, प्रसंगी खासगी वाहने ताब्यात घेऊन त्याआधारे प्रवासी वाहतूक करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.यासंदर्भात मंगळवारी रात्रीच सर्व जिल्हाधिकाºयांना आदेश दिले आहेत. एस.टी. कर्मचाºयांचा संप हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यात मोडत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी खासगी वाहने अधिग्रहीत करणे, कार, जीप, टॅक्सी तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसेस, ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस, मालवाहतूक वाहने ताब्यात घेऊन त्याच्या आधारे प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी आरटीओ, पोलीस व गृहरक्षक दलाची मदत घेऊन जे कर्मचारी संपात सहभागी नाहीत त्यांच्या मार्फत वाहतूक सुरू करण्याचे व एस.टी.ला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, वाहनांवर दगडफेक करून नुकसान करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले. वाहने चालविण्यासाठी चालक उपलब्ध होत नसतील तर शासकीय कार्यालयांतील चालकांची मदत घेण्यात यावी व त्यांनी जर कामे करण्यास नकार दिला तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देशही दिले.आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बुधवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, आरटीओ, एस.टी. विभागीय नियंत्रकांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती करून घेतली. जिल्ह्यात सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचे मार्ग कोणते, त्या मार्गावर वाहतुकीची अन्य साधनांबाबत माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने एस.टी.च्या विभागीय नियंत्रकांकडून मोठ्या आॅपरेशनची माहिती घेतली. त्यात प्रामुख्याने जळगाव, धुळे, मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, औरंगाबाद, नगर, पुणे, नंदुरबार, साक्री या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. खर्च कोण करणार?खासगी वाहने ताब्यात घेऊन प्रवासी वाहतुकीचे आदेश शासनाने दिले असले तरी, या वाहनांचे भाड्याचे पैसे कोण देणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. त्यामुळे हा पर्याय बाळगल्यात जमा आहे.