शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याचा ‘विश्वास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:24 IST

शहरातील कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्याकरिता आणि सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरणाची निर्मिती करून देण्यासाठी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याची ‘मोहीम’ आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हाती घेतली आहे.

नाशिक : शहरातील कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्याकरिता आणि सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरणाची निर्मिती करून देण्यासाठी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याची ‘मोहीम’ आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पुण्यनगरीच्या ‘पंचवटी’मधून त्यांनी बुधवारी (दि.१३) केला.नाशिक आयुक्तालयाचा पदभार स्वीकारताच नांगरे पाटील यांनी नाशिक पुण्यनगरी असून, या शहरात गुन्हेगारांना राहता येणार नसल्याचा संकेत बोलून दाखविला होता. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच त्यांनी आपल्या धोरणात्मक आराखड्यानुसार धडक कारभाराला सुरुवात केली आहे.नाशिककरांना भयमुक्त वातावरण निर्माण करून देणे हेच ध्येय असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कायदासुव्यवस्थेशी कुठलीही तडजोड कोणीही करण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या पहिल्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या भेटीतूनच दाखवून दिले.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील