शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

कायद्याचा त्रास अन् हनुमानाला वनवास मनपाची कारवाई : जन्मोत्सवाच्या दिवशी ‘तो’ परिसर सुनासुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:58 IST

नाशिक : कागदी पुरावे द्या, नाही तर धार्मिक स्थळ अनधिकृत अशी सूचना देत महापालिकेने गेल्यावर्षी राबविलेल्या मोहिमेत अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली.

ठळक मुद्देभाविकांची गर्दी होणारा हा परिसर यंंदाही सुनासनाचअनेक धार्मिक स्थळे जुनी होती

नाशिक : कागदी पुरावे द्या, नाही तर धार्मिक स्थळ अनधिकृत अशी सूचना देत महापालिकेने गेल्यावर्षी राबविलेल्या मोहिमेत अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यातील व्दारका, काठे गल्ली आणि गंगापूररोडवरील नरसिंहनगर येथील हनुमान मंदिरे हटविण्यात आल्याने एरव्ही उत्सव कालावधित भाविकांची गर्दी होणारा हा परिसर यंंदाही सुनासनाच होता. नियमित याठिकाणी दर्शन घेण्यासाठी जाणारे भाविकही यानिमित्ताने हळहळले. कोणेएकेकाळी प्रभू रामचंद्रांना वनवास घडल्यानंतर ते नाशिकच्या दंडकारण्यात वास्तव्याला होते. त्यामुळेच की काय परंतु नाशिकमध्ये रामभक्त हनुमानाची मंदिरे मोठ्या प्रमाणात होती. परंतु केवळ कायदेशीर त्रासातून हनुमानाची सुटका झाली नाही. त्यामुळे व्दारका चौफुली (देवळाली नाका) तसेच काठे गल्ली सिग्नल आणि नरसिंहनगरातील मंदिरेदेखील हटविण्यात आली आणि मूर्ती स्थलांतरित करून हनुमानालाच वनवास भोगावा लागत आहे. केवळ हनुमान मंदिरच नव्हे तर सर्वच रस्त्यात बाधीत असलेले आणि कित्येक तर रस्त्याला बाधीत नसलेल्या धार्मिक स्थळांना एकच न्याय लावण्यात आल्या. यातील अनेक धार्मिक स्थळे जुनी होती, परंतु केवळ १९९९ पूर्वीचा एखादा पुरावा नाही तसेच त्यावेळी ट्रस्टच नियुक्त नव्हता, स्थानिक नागरिक किंवा एखादे मित्रमंडळ त्याची देखभाल करीत होते, अशा सर्वच धार्मिक स्थळांना त्याचा फटका बसला आणि अखेरीस मूर्ती विधिवत काढून घेण्यास सांगण्यात आले आणि धार्मिक स्थळे हटविण्यात आली. शनिवारी (दि. ३१ मार्च) हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु ज्या ठिकाणी अशाप्रकारची मंदिरे हटविण्यात आली तेथे मात्र उत्साह नव्हता. उच्च न्यायालयाने रस्त्यातील धार्मिक स्थळ हटविण्याचे आदेश दिल्यानंतर कसेही सर्वेक्षण करून न्यायालयात यादी सादर करणाऱ्या तसेच सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे हटविण्यासाठी तत्काळ कृती करणाºया महापालिका आणि राज्य शासनाने मात्र मद्यपानाची दुकाने स्थलांतरित होऊन महसूल बुडू नये यासाठी मोठा आटापिटा केला. महापालिका हद्दीत नसलेले राज्य महामार्ग हे बळजबरीने महापालिकेकडे हस्तांतरित केले. मात्र, धार्मिक स्थळांसाठी असा तोडगा काढण्यात आला नाही.मंगल कार्यालयांची अडचणव्दारका परिसरात दोन ते तीन मंगल कार्यालये असून तेथे विवाह सोहळ्यापूर्वी दर्शनासाठी नवरदेवाला नेले जात असे. नृरसिंहनगर परिसरातदेखील असाच प्रकार आहे. त्यामुळे आता अनेक मंगल कार्यालयांना हनुमान मंदिरांना पर्याय शोधावा लागला असून काही मंगल कार्यालयांनी आवारातच छोटेखानी हनुमान मंदिर साकारले आहे.