शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

इगतपुरी तालुक्यात  माळवाडी येथे तिहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:46 IST

इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे शनिवारी (दि. ३०) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तरुणाने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने इगतपुरी तालुका हादरला आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे शनिवारी (दि. ३०) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तरुणाने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने इगतपुरी तालुका हादरला आहे. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत जमावास शांततेचे आवाहन करत संशयित आरोपीस ताब्यात घेतले.  माळवाडी येथे शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे (२३) याने नात्याने चुलत भावबंद असलेल्या घरातील तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. इतका शिकलेला असूनसुद्धा तुला नोकरी मिळत नाही, याबाबत वारंवार डिवचल्याचा राग मनात ठेवून हे हत्याकांड घडविल्याची कबुली संशयित आरोपीने पोलिसांपुढे दिली आहे. हिराबाई शंकर चिमटे  (५५) ह्या आपल्या नातवासह घरात बसलेल्या होत्या.  सून मंगला गणेश चिमटे (३०) या घरामागे केरकचरा टाकण्यासाठी गेल्या असता, संशयित सचिन याने मंगला यांना एकटे गाठून धारदार चाकूने गळ्यावर वार केले. त्यात मंगला खाली कोसळल्या यावेळी मुलगा यश याने आपल्या आईवर झालेला हल्ला पाहताच घराकडे धाव घेत आजीला घडलेला प्रकार सांगितला.तोपर्यंत आरोपीने मंगला हिस घरात ओढत आणले असता सासू हिराबाई यांनी त्यास जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हिराबार्इंच्याही गळा आणि मानेवर धारदार चाकूने वार केले. त्यानंतर नातू रोहित (४ ) याच्या गळ्यावर सचिनने वार केले. दुसरा नातू यश (६) हा घरातून पळून जात असताना आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजी, आई आणि भावास पाहून आपला जीव वाचवण्यासाठी यश याने आपला डावा हात पुढे केल्याने तो जखमी झाला. जखमी यशने तिथून पळ काढत गावातील मुख्य रस्त्यावर धाव घेत नागरिकांकडे मदतीसाठी मागणी करू लागला. यावेळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस चांगलाच चोप दिला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले आणि जमावास शांत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आले. या हत्याकांडामुळे इगतपुरी तालुक्यासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.पोलिसांचे शांततेचे आवाहनघटनेची माहिती तालुक्यात पसरताच लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी रु ग्णालयात एकाच गर्दी केली. यावेळी पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत जमावास शांत केले. घटनेचे गांभीर्य पाहता शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेह नंतर नाशिक जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने इगतपुरी तालुका हादरून गेला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी आरोपीचे आई, वडील आणि दोन बहिणींनाही ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपाधीक्षक अतुल झेंडे घटनास्थळी दुपारी रवाना झाले.आरोपीची कबुलीसंशयित आरोपी सचिन याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले होते. या खुनाचे कारण पोलिसांपुढे सांगताना आपणास नेहमी ‘तूू इतका शिकला सवरलेला असताना तुला नोकरी मिळत नाही’ या सततच्या टोमण्याने व्यथित होऊन सदर गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली पोलिसांपुढे संशयितआरोपीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.जमिनीचा वादवर्षभरापूर्वी पाच भावांत जमीन वाट्याला कमी आली होती. त्यावरून वाद विकोपाला गेला होता. चाळीस एकर जमीन वडीलभाऊ हरी नामदेव चिमटे यांच्या नावावर होती. चार वर्षांपूर्वी हरी हे मयत झाल्यावर उर्वरित चार भावांत झालेले हिस्से मनासारखे झाले नव्हते. त्यातून लक्ष्मण, शंकर, भीमा व गणपत चिमटे यांच्यात वर्षभरापूर्वी भांडण होऊन वाद मिटविण्यात आला होता; मात्र संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे याच्या मनात चुलते शंकर यांच्या बाबत राग होता. संधीचा फायदा घेत संशयित आरोपीने शनिवारी तिहेरी खून करीत आपल्या मनातील खदखद उघड केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Murderखून